राज्यात सरकारला लव्ह जिहादबद्दल जो कायदा आणायचा तो त्यांनी आणावा पण त्याच सोबत सरकारने हा पण कायदा आणला पाहिजे की ज्या भागातील शेतकरी आत्महत्या करत असेल त्या ठिकाणच्या कलेक्टरला सस्पेंड केले पाहिजे, त्या मंत्र्यांने आपले पद सोडले पाहिजे, सरकार असताना शेतकरी, तरुण मुलं आत्महत्या करत असतील तर सरकारने त्याबद्दल काही कायदा आणला पाहिजे, लव्ह जिहादपेक्षा यावर कायदा आणणे गरजेचे आहे असे काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी म्हटले आहे. अस्लम शेख म्हणाले की, महाराष्ट्रात ड्रग्ज हे मॅक्सिकोसारखे वाढत चालले आहेत. 1600 कोटी रुपयांपेक्षा जास्त ड्रग्ज हे जप्त करण्यात आले आहेत. आमदार योगेश सागर यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना पकडले. शाळा, कॉलेजसमोर पानपट्टीवर आणि रेल्वे, बसमध्ये जर ड्रग्ज विकले जात असतील तर कुठेतरी नियंत्रण कमी झालेले आहे. पोलिसांना कारवाई करण्यासंदर्भात मोकळीक दिली पाहिजे. कारवाई कडक केली पाहिजे, काही ठिकाणी आणन मकोका लावला आहे त्यामध्ये संपत्ती जप्त करता येऊ शकते. ते कुठेही लागू केले नाही. सरकारची ड्रग्जवर कारवाई करण्यासाठी दुबई, सिंगापूर, सौदी यांच्यासारखे अंमलबजावणी करावी लागेल. राज्यात जसे गुटख्यावर कारवाई सुरू केली होती, गुटखा ज्या पद्धतीने बंद झाला त्याच पद्धतीने ड्रग्ज बंद होऊ शकतात. मुळ मुद्दे बाजूला अस्लम शेख म्हणाले की, देशात आणि राज्यात काय सुरू आहे हे लोकांना समजणे गरजचे आहे.एकीकडे तुम्ही असे कायदे आणत आहात तर दुसरीकडे देशाची संपत्ती तुम्ही विकत चालले आहे, त्यासंदर्भात काहीही कायदे आणले जात नाही, आता जर सगळे विकून टाकले तर आपल्या पुढच्या पिढीच्या वेळेस सरकारकडे काही राहणार नाही. देश काही लोकांना द्यायचे ठरवले असेल त्यावर चर्चा होत नाही. मुळ मुद्दे बाजूला करत केवळ धार्मिक गोष्टीवर चर्चा सुरू आहे. मविआच्या बैठकीत निर्णय होणार अस्लम शेख म्हणाले की, राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणुकीसाठी सर्वच पक्ष बैठका घेत आहेत. तशीच एक बैठक मविआची आहे. यावर निवडणूक आणि सभागृहासंदर्भात चर्चा होणार आहे. ज्येष्ठ नेते काय निर्णय घेतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाच्या वेळी आमची बैठक होत असते. आमच्यामध्ये एकमत नाही असे बोलणे योग्य नाही. मविआचे सर्व नेते बसून चर्चा करतात आणि निर्णय घेत असतात. मुंबईमध्ये प्राथमिक चर्चा होते, आणि फायनल निर्णय दिल्लीत होतो. दोन जागा आहेत आणि 3 पक्ष त्यामुळे कोणत्या तरी एका पक्षाला थांबावे लागेल हे स्पष्ट आहे.
लव्ह जिहादपेक्षा शेतकरी आत्महत्येवर कडक कायदा आणा:शाळा-कॉलेजबाहेर ड्रग्जची विक्री, पोलिसांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक द्या- अस्लम शेख
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
साताऱ्यातील करंजेत गॅरेज चालकावर कोयत्याने हल्ला:शाहूपुरी पोलिसांकडून...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
मुंबईत माझ्याविरोधात कट, स्टिंग ऑपरेशनमध्ये महिलेचा सहभाग:कट...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
अजित पवारांचा विमान अपघात हा घातपातच:आमदारांचा अवमान...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
मेधा सोमय्या मानहानी खटल्यात संजय राऊतांना दिलासा:शौचालय...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
मरीनड्राईव्ह पोलिसांचा रोहित पवारांच्या अर्जावर महत्त्वाचा निर्णय:काल...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
अर्थसंकल्पीय अधिवेशन:महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकोनॉमी झाल्यावर जगातील...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
