सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडून उपलब्ध जलसाठ्यातून रविवारी (१ मार्च) सकाळी ९.३० वाजता गेट क्रमांक २,३ व ४ मधून सुमारे ३० हजारक्युसेक वेगाने ०.६ टीएमसी पाणी तेलंगणाच्या दिशेने सोडण्यात आले. पाणी सोडल्यानंतर बंधाऱ्याचीपातळी ३३०.८० मीटर असून ७.१८दलघमी साठा शिल्लक आहे. बाभळी बंधारा पूर्ण होऊन १३ वर्षेपूर्ण झाली. या वर्षी बंधाऱ्यातक्षमतेइतका म्हणजेच २.७४ टीएमसीसाठा आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रतुडुंब भरले आहे. सर्वोच्चन्यायालयानुसार २९ ऑक्टोबर रोजीदरवाजे बंद करायचे आदेश होते,परंतु शेतकऱ्यांनी विरोध केल्यानेगतवर्षी १८ नोव्हेंबर २०२५ रोजीत्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीतदरवाजे बंद केले होते. त्यानंतररविवारी निर्देशानुसार विसर्ग केला.
