राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला असे काही नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या विद्यमान उमेदवारासाठी जागा मिळावी असे वाटत असते. जयंत पाटील म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या निधनामुळे पूर्णपणे थांबलेली आहे. आता ही चर्चा पुढे जाणे शक्य नाही आणि आम्ही कुणासोबत चर्चाही करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहे हे समजून घेणाराच आता नसल्याने विलीनीकरणाची पूर्णपणे थांबली असून यापुढे ही शक्यता नाही. विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या आग्रहाने सुरू झाली होती ती पूर्ण होऊ शकली नाही. आता हा प्रश्न बाजूला गेलेला आहे. आमच्यावर दोन्हीही पक्षाला शंका असण्याचे कारण नाही. आम्ही ठाकरेंना आमची इच्छा सांगितली जयंत पाटील म्हणाले की, काल मी आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शरद पवार यांनी दिल्लीत असणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे ती उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली. आमच्या पक्षाने आणि काँग्रेसने एकत्र बसत काल किंवा आज निर्णय घेऊ असा उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. मिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करणार आहोत. राज्यसभेसंदर्भात निर्णय झालेला नाही जयंत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचे बरोबर आहे अजून राज्यसभेसंदर्भात काहीही निर्णय झालेला नाही. निर्णय झाला असे आम्हीही सांगितले नाही. मविआतील सर्व पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. मविआ आणि राष्ट्रवादीसाठी शरद पवार दिल्लीत असणे गरजेचे आहे. शरद पवारांनी राज्यसभेवर जावे यासाठी आम्ही आज सुद्धा चर्चा करणार आहोत. आता फक्त राज्यसभेची चर्चा सुरू आहे. मविआ एकत्रित असेल तर विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत काहीही अडचण येणार नाही. पायलटचे कॉल रेकॉर्ड तपासावे जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाताबद्दल सरकारने पारदर्शक चौकशी केली पाहिजे. तांत्रिक चौकशीमध्ये सर्व काही समोर आले पाहिजे. पायलट बदलला का? त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासणे, जो पायलट आला त्यांच्याशी कोणाचे बोलणं झाले या सर्व गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. सरकारने जनतेच्या मनातील शंका दूर केली पाहिजे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला:शरद पवारांनी दिल्लीत असणे गरजेचे, अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी करा- जयंत पाटील
-
By सुरेश पाचभाई
- March 4, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
अमेरिका आता स्वतःच ‘नरक’ बनलीये:डोनाल्ड ट्रम्प यांच्या...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
राज्यातील आरोग्य समित्यांचे होणार पुनरुज्जीवन:सर्वसामान्यांना मिळणार दर्जेदार...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
गोऱ्हेंना विधान परिषदेची उमेदवारी नकोच!:24 वर्ष आमदार...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
धीरेंद्र शास्त्रींच्या विधानानंतर ‘सह्याद्री’ आक्रमक:’आम्हाला शिवराय शिकवू...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर:आता मेन्युकार्डवर ‘पनीर’...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
माढ्यात विवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू:शिक्षक पतीवर...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
श्याम मानव सध्या केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात:मुख्यमंत्र्यांनी माजी...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
