Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

व्हीएसआर कंपनीला कुणीतरी वाचवतंय!:तपास खोलवर झाला पाहिजे, अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांनी व्यक्त केली शंका

मी काही VSR आणि डीजीसीएच्या विरोधात नाही, त्यांचे आणि माझे काही वैर नाही. अजित पवारांचा जो अपघात झाला त्यामध्ये जे विमान होते ते VSR चे होते, डीजीसीए हे तपास यंत्रणेमार्फत तपास होत आहे, यामध्ये खोलवर गेल्याशिवाय काय ते कळणार नाही. व्हीएसआर कंपनीला कोणीतरी वाचवतंय याचा अंदाज आम्हाला येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, जर व्हीएसआर (VSR) कंपनीला वाचवण्यासाठी काही मोठ्या आणि ताकदवान व्यक्तींकडून मदत केली जात असेल, तर हा नेमका अपघात आहे की घातपात, याचा तपास योग्य पद्धतीने होणार नाही. हा तपास योग्य रीतीने पूर्ण होण्यासाठी त्याकडे ‘क्रिमिनल’ आणि ‘तांत्रिक’ अशा दोन्ही अँगलने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित कंपनीने अहवालात हे विमान Learjet 45 XR असल्याचे मान्य केले आहे. ज्यावेळी हा प्रसंग घडला, तेव्हा विमानात 90 टक्के इंधन भरलेले होते. हे विमान पूर्वी सुरतला गेले होते. विशेष म्हणजे, रनवे 29 वर उतरण्याची अधिकृत परवानगी असताना, विमान रनवे 11 वर उतरवण्याचा प्रयत्न का झाला? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अहवालात अनेक चुका रोहित पवार म्हणाले की, विमान अपघातासारख्या संवेदनशील प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने होणे अपेक्षित असताना, तपास यंत्रणेने तयार केलेल्या अहवालात अनेक प्राथमिक आणि तांत्रिक चुका आढळल्या आहेत. यावरून आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अहवाल तयार करण्यासाठी महिनाभराचा वेळ घेऊनही त्यात बारामतीला ‘जिल्हा’ दाखवण्यात आले आहे, तसेच तिथे ‘महानगरपालिका’ (मनपा) असल्याचा चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये विमान डाव्या बाजूला पडल्याचे स्पष्ट दिसत असताना, अहवालात मात्र त्याबाबत चूक करण्यात आली आहे. हे विमान अनेक झाडांना धडकून खाली पडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, जे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे रोहित पवारांचे म्हणणे आहे. अहवालात म्हटलंय की विमान झाडांना धडकून पडलं, पण प्रत्यक्षात तिथं झाडं कुठे आहेत? तिथं केवळ छोटी झुडपं आहेत. झुडपाला साधं विमान टचही झालेलं नाही. झाडांची उंची आणि विमानाची उंची यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. केवळ रिपोर्ट द्यायचा म्हणून आणि अपघाताची जबाबदारी झाडांवर ढकलून देण्यासाठीच AAIB कडून असा दिशाभूल करणारा अहवाल तयार करण्यात आला. विमानतळाची रेकी करण्यात आल्याचा दावा रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी रेकी करण्यासाठी तिथे काही लोकं आली होती असे स्थानिकांनी सांगितल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे, याचा तपास झाला पाहिजे याकडे सीआयडी आणि सीबीआयने थोडेसे लक्ष घालावे असे आमचे मत आहे. VSR कंपनीच्या विमानाचा 2023 मध्ये अपघात झाला होता त्यावेळी एका व्यक्तीचे नाव तपास अधिकारी म्हणून लिहण्यात आले होते. पण अजित पवारांच्या अपघाताच्या अहवालात कोणत्याही तपास अधिकाऱ्यांचे नाव नाही. कारण ते घाबरले असतील कारण कागदपत्रांची हेराफेरी आणि इतक्या गोष्टी होणार आहे, त्यामुळे नावच देऊ नका म्हणजे त्यांच्यावर कोणी आक्षेपच घेणार नाही.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!