नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केले आहे. अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्रात येऊन येथील लोकांना छत्रपती शिवाजी महाराज ‘शिकवण्याचा’ हा धंदा नवा नाही. दुर्दैवाने त्यात कधीकाळी आमच्यातच राहिलेले काही महाभागही सामील झाले आहेत. विषय इतकाच आहे की, ही सगळी टोळी आता भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसते. महाराष्ट्रात लेकरू आई-बापाला ओळखण्यापूर्वीच शिवाजी महाराजांना ओळखू लागते, हे या वाचाळांना बहुदा ठाऊक नसावे! तसेच, वणी-दिंडोरीच्या लढाईत महाराज स्वतः बख्तर चढवून रणांगणात उतरले होते आणि त्यांनी सहा तास अविश्रांत झुंज दिली होती, याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. कोणाला हवे असतील, तर ते आम्ही जरूर पाठवून देऊ, असे दानवे यांनी म्हटले आहे. अमोल कोल्हे काय म्हणाले? तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावर भाष्य करत आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, मुघली आक्रमणासमोर उत्तर भारताने पळी पंचपात्र दडवून मान झुकवलेली असताना, सह्याद्रीच्या कातळावर तलवारीच्या पात्याने इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरेतून येऊन चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये. शिवविचारांवर पिंड पोसलेल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आराध्य दैवत नाहीत तर आमची अस्मिता, स्वाभिमान आणि ओळख आहेत… काल, आज आणि उद्याही, असे स्पष्ट केले आहे. काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री? शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि आपला मुकूट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा, असे म्हटल्याचा दावा शास्त्री यांनी केला होता.
धीरेंद्र शास्त्रींच्या विधानानंतर ‘सह्याद्री’ आक्रमक:’आम्हाला शिवराय शिकवू नका’, अंबादास दानवे आणि अमोल कोल्हेंचा घणाघात
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
अमेरिका आता स्वतःच ‘नरक’ बनलीये:डोनाल्ड ट्रम्प यांच्या...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
राज्यातील आरोग्य समित्यांचे होणार पुनरुज्जीवन:सर्वसामान्यांना मिळणार दर्जेदार...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
गोऱ्हेंना विधान परिषदेची उमेदवारी नकोच!:24 वर्ष आमदार...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर:आता मेन्युकार्डवर ‘पनीर’...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
माढ्यात विवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू:शिक्षक पतीवर...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
श्याम मानव सध्या केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात:मुख्यमंत्र्यांनी माजी...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
भररस्त्यात प्रसूतीचा थरार; डॉक्टर ठरल्या देवदूत, आई-बाळाचा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 25, 2026
