मिठी नदीचे नाव काढत संजय राऊत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. मिठी नदी कोणाला विकली, तिचा गाळ खात कोण श्रीमंत झाले, त्यातून कुणी घरे बांधले हे मुंबईकरांना माहिती आहे. दिनु मोर्या कुणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटले याची संपूर्ण माहिती सर्वांना आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात जोराचे भांडण सुरू आहे. रोज उठायचे मिठी नदीचे नाव घेत त्यामधील भ्रष्ट्राचार बाहेर आला पाहिजे यासाठी राऊत प्रयत्न करत आहे. ते समोर आले की आदित्य ठाकरे आणि कंपनीचा भ्रष्टाचार पुढे येणार आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी राऊत रोज त्यावर बोलत आहेत. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी सुपारी घेतली आहे की येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे यांना संपवायचे आणि उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, म्हणून मिठी नदीचे नाव वारंवार त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंना या प्रकरणी अडचणीत आणण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे. या नदीचा गाळ खाणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अदानी-अंबानींच्या लग्नात जाऊन कुणी डान्स केला होता. कोणी हात जोडले होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. घरगुती सिलिंडर कमी पडणार नाही नवनाथ बन म्हणाले की, सरकार अफवा पसरवण्याचे काम करत नाही तर माहिती देण्याचे काम करते. राऊतांकडून रोज सकाळी अफवा पसरवण्याचे काम होते. आज शहरामध्ये बुकींग करताच 25 दिवसांमध्ये सिलिंडर मिळते. साठेबाजीमुळे काही ठिकाणी तुटवडा आहे, पण घरगुती सिलिंडर कमी पडणार नाही.गॅसचा पाईप असेल तर सिलिंडर का हवे आहे.लोकांना सिलिंडर मिळू नये म्हणून त्यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहे. 40 देशांतून कच्च्या तेलाची आयात नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 140 कोटी भारतीयांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात रोज बैठका होत असून आपन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. इराणकडून सुरक्षितपणे पुरवठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर 40 देशांकडून कच्चे तेल आपण आयात करत आहोत.आपल्याकडे कुठेही पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागलेल्या नाहीत. फक्त काही ठिकाणी गॅसचा प्रश्न निर्माण झाला आहे, पण त्याचा फटका जनतेला बसू नये याची पूर्ण काळजी सरकार घेत आहे. राऊतांसारखे घरात बसणारे हे सरकार नाही.
संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतली आहे का?:उबाठा गट ताब्यात घेण्यासाठी राऊतांचे प्रयत्न- नवनाथ बन
-
By सुरेश पाचभाई
- March 14, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
अशोक खरातच्या पत्नीचा पाय खोलात:अटकपूर्व जामिनावरील सुनावणी...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 12, 2026
NEET प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमधून बाहेर पडल्याचा...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 12, 2026
केरोसीन उचलण्यास स्वस्त धान्य दुकानदारांचा नकार:अत्यल्प कमीशन,...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 12, 2026
12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द:विधानसभा अध्यक्षांचा...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 12, 2026
विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ करणे योग्य नाही:हा हलगर्जीपणा...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 12, 2026
एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे कठीण:छगन भुजबळांचे इंधन...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 12, 2026
