Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 864 कुटुंबांना घरांच्या चाव्या:प्रतीकात्मक मोठी चावी पाहून लाभार्थांनी विचारले- खऱ्या चाव्याही मिळणार ना?

मुंबईतील नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला महत्त्वाचा टप्पा गाठताना 864 कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नव्याने बांधलेल्या घरांची पहिली चावी 80 वर्षीय शोभा गायकवाड यांना सुपूर्द केली. प्रतीकात्मक मोठी चावी पाहून त्यांनी मुख्यमंत्र्यांना हसत विचारले की, यासोबत खऱ्या चाव्याही मिळणार का? त्यावर मुख्यमंत्र्यांनी होकार देताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उसळला. अनेक वर्षांपासून चांगल्या घराची वाट पाहणाऱ्या रहिवाशांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. बीडीडी चाळीत अनेक कुटुंबे दीर्घकाळ अतिशय लहान आणि जीर्ण घरांमध्ये राहत होती. शोभा गायकवाड यांसारख्या रहिवाशांनी 160 चौरस फुटांच्या घरात आयुष्य काढले. आता त्यांना दादरच्या नायगाव परिसरातील सुमारे 500 चौरस फुटांचे नवे घर मिळणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 864 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या असून दशकांपासून पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण झाल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील महत्त्वाचे मुद्दे :

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!