रुपाली चाकणकर या मुर्ख आहेत त्या खोटे बोलत आहेत. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहूच नये, त्यांच्यात थोडीच जरी नैतिकता असेल तर त्यांनी पद सोडले पाहिजे, नाशिक भोंदू बाबा प्रकरणी वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अनेक गोष्टी चर्चेत येत होत्या, एका महिलेने हे सगळे सहन न झाल्याने तक्रार दाखल केली. तुम्ही अनेकांवर दबाव आणून तक्रार दाखल न करु दिल्याची प्रकरणे समोर आली आहेत. संजय राऊत म्हणाले की, महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. त्या वादग्रस्त आहे त्यांना कोण आणि का वाचवतंय हा प्रश्न मला पडला आहे. त्या नाशिकच्या भोंदू बाबाने अनेक महिलांवर अत्याचार केले त्या मराठी महिला आहेत अशी माहिती माझ्याकडे आहे. त्यांच्या पाद्यपुजन करायला सत्ताधारी लोकं जातात आणि गृहमंत्री डोळेबंद करत बसले आहे. ..तर त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण्याचे नाशिक जिल्ह्यातील आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत त्यांना काल बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. हे एक प्रकरण नाही अशी अनेक प्रकरणे समोर येत आहे, पोलिसांनी जो मुद्देमाल जप्त केला आहे त्यातून राज्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांचे पुरावे त्यात असल्याचे सांगितले जाते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा शासनाने मंजूर केला आहे. असे असताना सुद्धा शासनातील मोठ्या पदावरील बसलेल्या व्यक्ती मग त्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष असू देत किंवा मंत्री, आमदार हे सगळे अंधश्रद्धेने त्या बाबाचे पुजा करत आहे. कोणी जादूटोण्याला बसले आहे, त्यांच्यासोबत ज्यांची ज्यांची छायाचित्र आले आहेत, त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले पाहिजे. मंत्र्यांना गृहमंत्रालयाने बडतर्फ करावे संजय राऊत म्हणाले की, महिला आयोगाच्या अध्यक्षांचे काम काय आहे की महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवणे, अशा गुन्हेगारांवर कारवाई करणे, मंत्री, नेते जर अशा लोकांच्या पायाजवळ बसत असतील तर महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस पदावर का ठेवतात. ज्यांचे संबंध तिथे उघड होत आहे त्यांना पदावरुन दूर केले पाहिजे. त्या भोंदू बाबाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. ढोंग आणि अंधश्रद्धेविरोधात लढणारे हे पहिले राज्य आहे. सत्तेत टिकण्यासाठी मंत्रीच असे करणार असतील तर गृहमंत्रालयाने यांना बडतर्फ करायला हवे.
रूपाली चाकणकर यांनी नैतिकतेच्या आधारावर पद सोडावे:नाशिकचा भोंदू बाबा अन् सत्ताधाऱ्यांचे कनेक्शन, संजय राऊत आक्रमक
-
By सुरेश पाचभाई
- March 19, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
हिंगोली शहर स्वच्छतेसाठी पालिकेचे पाऊल:७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 11, 2026
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई:18 महिन्यांनंतर...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 11, 2026
बांगलादेशी तरुणीने प्रेमासाठी ओलांडली सीमा:जळगावात दुसरी ‘सीमा...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 11, 2026
