मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त करत राज्य सरकारने सीबीआय चौकशीसाठी केंद्राला अद्याप पत्र दिले नसल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी लिहिलेले अधिकृत पत्र समोर आले असून, यामुळे या प्रकरणाला आणि राजकीय चर्चांना मोठी कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च रोजीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अधिकृत पत्र पाठवले असल्याचे समोर आले आहे. या पत्रात त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या मागणीचा विशेष उल्लेख केला असून, त्यांच्या पत्राची प्रतही देवेंद्र फडणवीस यांनी सोबत जोडली आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, फडणवीसांचे हे पत्र उघड झाल्यामुळे आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, मंगळवारी आमदार रोहित पवार यांनी आपल्याकडे अपघात संदर्भात मोठी माहिती असल्याचे सांगितले होते. तसेच सरकारने काही पाऊल उचलले नाही तर माहिती समोर आणू, असा इशाराही त्यांनी दिला होता. रोहित पवार म्हणाले की, अपघात संदर्भातील मोठी माहिती माझ्याकडे आहे. अगदी काही माहिती आम्ही आत्ता समोर आणली आहे. सरकार काय पाऊल उचलते हे बघू नाहीतर ती मोठी माहिती समोर आणू, असा इशारा पवारांनी दिला. अजित पवार यांच्या सोबत सत्तेत असणारे किती स्मरण पत्र देणार, सत्तेत असून तुम्ही आपल्या माणसाला न्याय देऊ शकत नाही तुम्ही इतरांना काय न्याय देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी हे सुद्धा अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. पण चर्चा होऊ द्यायची नाही असे दिसत आहे. VSR कंपनीला वाचवले जात आहे, याच्या मागे कोणीतरी मोठा माणूस असल्याची शंका पवारांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार विमान अपघात प्रकरण:CBI चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांचे अमित शहांना पत्र, रोहित पवारांच्या मागणीची प्रतही जोडली
-
By सुरेश पाचभाई
- March 18, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
मारेगाव दणाणलं! गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत भक्ती, परंपरा आणि...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 19, 2026
सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसचे पदाधिकारी मैदानात:बारामतीत उमेदवारीवरून संघर्ष;...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 19, 2026
गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष:शोभायात्रांचा उत्सव, भगवामय वातावरण; मुंबई-ठाणे-नागपूरसह...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 19, 2026
रूपाली चाकणकर यांनी नैतिकतेच्या आधारावर पद सोडावे:नाशिकचा...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 19, 2026
ऑपरेशन टायगरची चाहूल? नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 19, 2026
कॅप्टन अशोक खरातला 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी:अंकशास्त्रज्ञाच्या...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 19, 2026
शिवतीर्थावर आज राज ठाकरेंची गर्जना:उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीनंतरचा...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 19, 2026
