मराठा समाजापासून दलित, मुस्लीम, धनगरसमाज तुटला नाही पाहिजे. मराठा समाजापासून इतर समाज तोडण्याचे कुणाचे काही षंड्यत्र आहे का हे सुद्धा मराठा समाजाने बघितले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्राण आहेत, पुतळे बसवा पण त्याच्याआडून दुसरे काही सुरू नाही ना? याकडे लक्ष दिले पाहिजे. मनोज जरांगे म्हणाले की, वाद होतील अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारू नका. आपल्या राजांनी आपल्यासाठी खूप काही केले आहे. त्यांनी जे केले ते कुणीही करु शकलेले नाही. छत्रपती शिवराय यांचा पुतळा वाद होईल अशा ठिकाणी बसवू नये. हे काही षंड्यत्र आहे का हे पाहिले पाहिजे. षंड्यत्र झाले की झाल्या जातीय दंगली सुरू. मराठ्यापासून दलित, मुस्लीम, धनगर तुटू नये याची काळजी घेतली पाहिजे. शिवाजी महाराज यांचे पुतळे देतंय कोण? मनोज जरांगे म्हणाले की, शिवाजी महाराज यांचे पुतळे देतंय कोण? ते लावण्यास सांगत मराठा समाजाच्या विरोधात इतर सर्व समाज करण्याचा प्रयत्न कोण करतंय का? यात मी लक्ष घालणार आहे. कारण विनाकारण दलित-मराठा वाद होत आहे. माझा समाज आणि मी यामध्ये बदनाम होत आहोत. मराठा समाज पुतळे बसवत नाहीये, आम्ही असे काही कोणाला सांगत नाही. बाहेर वेगळे मेसेज जात आहेत असे मला समजले. मराठ्याच्या अंगावर दलित, मुस्लीम, धनगर घालायचा पुतळ्याच्या आडून हे कोणी करतंय का याची माहिती घ्यावी लागेल. कोणाची प्रामाणिक इच्छा सुद्धा यामागे असू शकते. जागा विकत घेत आपण पुतळे बसवू, पण वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसवू नका. वाद मिटला ही चांगली गोष्ट मनोज जरांगे म्हणाले की, सोलापूरच्या अंजनगावमधील वाद मिटला ही चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सर्व समाजाला एकत्र ठेवले आहे.त्याच विचाराने आपण पुढे चालणं गरजेचे आहे. या गोष्टीच्या मागे कोण होते हे पोलिस शोधून काढतील आणि दोन्ही समाज तिथे एकत्र राहतील. दोन-चार लोकं वाद निर्माण करत असतात त्यामुळे सर्व समाजाने वाद वाढवायचा नसता. जर प्रकरण मिटले नसते तर तोडगा काढण्यासाठी तिथे जाणार होतो. आता तिथे जाण्याची गरज नाही. वाद नाही, तो लावला जात आहे का? हे शोधले पाहिजे. पुतळा कोणी विकला हे शोधणं गरजेचे आहे. माझ्यासोबत फोटो काढत मी त्यांच्यासोबत आहे असे म्हणत मला कोणी बदनाम करू नये.
पुतळ्यांच्या आडून मराठ्यांविरुद्ध षडयंत्र?:आपल्यापासून दलित-मुस्लिम-धनगर समाज तुटता कामा नये! पुतळ्यांच्या वादामागे नेमकं कोण? जरांगे पाटील घेणार शोध!
-
By सुरेश पाचभाई
- April 4, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
मोठे मन दाखवण्याची मागणी काँग्रेसने फेटाळली:सुनेत्रा पवारांविरोधात...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 4, 2026
बावनकुळेंच्या कुटुंबीयांच्या नावे 1147 एकर जमीन?:सोशल मीडियावर...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 4, 2026
अंजली दमानियांना गुप्त माहिती पुरवणारे सरकारमध्येच:सरकारच्या निशाण्यावर...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 4, 2026
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक:वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 4, 2026
नांदेड गँगवॉरने हादरले, मध्यरात्री 3 जणांचा मर्डर:अगोदर...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 4, 2026
