राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज कामासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिवपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली. त्यांच्या 21 वर्षांच्या सेवाकाळात ही 25 वी बदली ठरली असून, या निर्णयामुळे प्रशासनात तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बदल्यांवर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, नांदेड दौऱ्यावर असलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकीसाठी ते नांदेडमध्ये आले होते. पत्रकारांनी मुंढे यांच्या वारंवार बदल्यांबद्दल विचारले असता खोत यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. माझं घराणं वारकरी संप्रदायाचं आहे. संत तुकाराम महाराजांविषयी मला चांगली माहिती आहे. माझे वडील वारकरी होते, त्यांना अनेक अभंग पाठ होते. पण नव्या युगातील तुकारामांबाबत मला फारशी माहिती नाही, असे वक्तव्य खोत यांनी केले. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याबद्दल थेट भाष्य करण्याऐवजी त्यांनी असा टोला लगावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मुंढे यांनी दिव्यांग विभागात अल्पावधीत केलेल्या कामाची दखल घेत त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नांदेडमध्ये दिव्यांग संघटनांनी राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. मुंढे यांची बदली रद्द झाली नाही, तर अंदाज समितीच्या आमदारांना घेराव घालू, असा इशाराही आंदोलकांनी दिला. यापूर्वी मंत्रालयातही या मागणीसाठी आवाज उठवण्यात आला होता. याचदरम्यान, नांदेड दौऱ्यात सदाभाऊ खोत यांनी परिवहन विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली. या पाहणीत विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर अनुपस्थित असल्याचे आढळल्याने खोत संतापले. ठरलेल्या वेळेनंतरही अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण आपला निषेध नोंदवण्यासाठी खोत यांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण केला. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. या सर्व घडामोडींमुळे मुंढे यांच्या बदलीसह प्रशासनातील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नव्या युगातील तुकाराम माहित नाहीत:मुंढेंच्या बदलीवर सदाभाऊ खोतांची टोलेबाजी; वक्तव्य चर्चेत; प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह
-
By सुरेश पाचभाई
- April 9, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
खरात-चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार?:सुषमा अंधारेंचा सवाल;...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 15, 2026
आजपासुन मारेगाव तालुक्याचे कोलगाव नगरीत भक्तीचा महाकुंभ…!
7views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 15, 2026
SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका:जस्टिस...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता:प्रणिती शिंदेंचा आरोप;...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
देशातील पहिली ‘ई-टीडीआर’ प्रणाली 15 एप्रिलपासून कार्यान्वित:टीडीआर...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
भोंदू अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी:गुंगीच्या...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
