बंडखोरांना शिवसेना ठाकरे गटाचा दणका:मुंबईतील 26 बड्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; अनिल परबांच्या निकटवर्तीयावरही कारवाई

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेता, अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करत, बंडखोराी करणाऱ्या नेत्यांना ‘मातोश्री’ने घरचा रस्ता दाखवला आहे. वारंवार देण्यात आलेले आदेश आणि अल्टिमेटम धुडकावून लावणाऱ्या २६ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. हकालपट्टी केलेल्यांमध्ये अनिल परब यांच्या निकटवर्तीयावरचाही समावेश आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. या कारवाईत प्रभाग क्र. ९५ मधील शेखर वायंगणकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. वायंगणकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरातील पक्ष संघटनेत त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईची कारणे काय? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ‘एबी फॉर्म’ धारक उमेदवारांविरोधात अर्ज भरून तो मागे न घेतल्याने ही कारवाई झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या युतीमध्ये जागावाटप झाले आहे. मित्रपक्षांच्या वाट्याला आलेल्या जागांवरही बंडखोरी केल्याने युती टिकवण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. एकाच पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात असल्यास मतविभागणी होऊन त्याचा फायदा थेट भाजप किंवा शिंदे गटाला मिळू शकतो, हे नुकसान टाळण्यासाठी बंडखोरांना बाहेर काढले गेले. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. बड्या नेत्यांवर कारवाई करून इतर पदाधिकाऱ्यांनी अशी हिंमत करू नये, असा जरब बसवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. ठाकरे गटाने जारी केलेल्या पत्रकानुसार हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी आणि प्रभागांची नावे खालीलप्रमाणे दरम्यान, या मोठ्या कारवाईमुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची अधिकृत फळी अधिक ताकदीने मैदानात उतरणार की बंडखोर अपक्ष म्हणून मोठे आव्हान उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!