उबाठाचे खासदार फुटणार असल्याच्या आणि त्यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. या बातम्या पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उबाठा गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की, उबाठाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही. अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.या स्पष्टीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, खासदारांच्या कथित बंडाच्या वावड्या केवळ ‘राजकीय स्टंट’ असल्याचे समोर आले आहे. नेमके शिंदेंची पोस्ट काय? एकनाथ शिंदे म्हणाले की, उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे. उबाठाकडून लोकप्रतिनिधींची बदनामी?- म्हस्के अशा पद्धतीची कुठलीही बैठक झालेली नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार-खासदार आमच्याकडे घेण्याची काही गरज वाटत नाही. त्यांच्यामध्ये काही नाराजी असेल तर आमदार-खासदारांची बदनामी करणे उबाठाच्या नेत्यांनी करू नये. तुमच्यासोबत असलेल्या लोकांची बदनामी करण्याचे काम उबाठाच्या नेत्यांनी करू नये, असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. नरेश म्हस्के म्हणाले की,दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच खासदार एकत्र असतात. आपल्या राज्यातील मंत्र्यांने चहा पानाला बोलावले तर जातात. प्रतापराव जाधवांकडे जेवनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा खासदार होते. त्यामुळे काहीही बातम्या पसरू नये. अरविंद सावंत यांचे पक्षातील विरोधक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असावे. उबाठातीलच काही लोकं या अफवा पसरवत लोकप्रतिनिधींना बदनाम करत आहेत.
ठाकरे गटाच्या खासदारांसोबत बैठकच झाली नाही:एकनाथ शिंदेंनी टाकला चर्चेवर पडदा; बातम्या निराधार, खोडसाळ असल्याचा आरोप
-
By सुरेश पाचभाई
- April 10, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार:मुख्यमंत्री...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 10, 2026
उरमोडी धरणाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ नाव:राज्य...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 10, 2026
राऊतांचा एक पाय काँग्रेसमध्ये, दुसराही लवकरच जाणार!:त्यांची...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 10, 2026
कर्नल पुरोहित यांना वर्षभरात दुसऱ्यांदा प्रमोशन:आता ब्रेगिडियर...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 10, 2026
