Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंच्या अपघातावर संशय:कंटेनर चालक जमाल वारिसने जबाबात दिली महत्त्वाची माहिती

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचा निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. शेळके यांच्या कारने समोर असलेल्या कंटेनरला मागून जबरदस्त धडक दिली आणि कार थेट कंटेनरखाली घुसली. या दुर्घटनेत जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर अपघाताबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेत कंटेनर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात त्याची सविस्तर चौकशी सुरू असून, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीमुळे तपास अधिक बारकाईने केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी शेळके यांची कार भरधाव वेगात होती. वेग नियंत्रणात नसल्यामुळे कार थेट कंटेनरला धडकली आणि त्याखाली अडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणात कंटेनर चालक जमाल वारिस याने पोलिसांना दिलेल्या जबाबात महत्त्वाची माहिती दिली आहे. तो उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी असून, हैदराबादहून अहमदाबादकडे जात होता. दुपारी सुमारे 12 वाजता कंटेनरच्या रेडिएटरचा पाइप लीक झाल्यामुळे वाहन गरम झाले. त्यामुळे त्याने वाहनाचा वेग कमी केला होता. मात्र, त्याने गाडी पूर्णपणे थांबवली नव्हती, असे त्याने स्पष्ट केले. जमाल वारिसने पुढे सांगितले की, तो रस्त्याच्या कडेला सावकाश गाडी चालवत असताना अचानक मागून जोरदार आवाज आला. त्या वेळी आरशात काही दिसले नाही. नंतर खाली उतरून पाहिले असता कार कंटेनरला धडकलेली दिसली. या घटनेने तोही हादरला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर अपघाताची दिशा स्पष्ट होत असली तरी काही शंका अद्याप कायम आहेत. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. चालकाची आणखी कसून चौकशी केली जाणार असून, अपघातामागे निष्काळजीपणा की अन्य काही कारण, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जितेंद्र शेळके यांच्या निधनामुळे त्यांच्या परिचितांमध्ये शोककळा पसरली असून, या घटनेने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!