ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सेटीस ब्रिजवर उभी असलेली ‘शिवशाही’ बस अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच बसमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले आणि आगीने भीषण रूप धारण केले. घटनेमुळे स्टेशन परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस ठाणे येथून पालघरमार्गे बोईसरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र ठाणे स्टेशनजवळ आल्यानंतर बस अचानक बंद पडली. चालकाने बस तपासण्याचा प्रयत्न करत असतानाच बसच्या खालच्या भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आग लागली. इंजिन आणि डिझेल टाकीजवळून आग लागल्यामुळे ती झपाट्याने पसरली आणि संपूर्ण बसने पेट घेतला. घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे 15 प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर धाव घेतली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काही क्षणातच बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने प्रवाशांचे सामानही नष्ट झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ धाव घेत अग्निशमन दलाला मदत केली. मात्र आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, बस काही मिनिटांतच पूर्ण जळून गेली आणि केवळ सांगाडा उरल्याचे चित्र दिसून आले. इंजिन गरम झाल्यामुळे आग लागली असावी या घटनेमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिन गरम झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे वाहनांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या आगीचा संबंधही तापमानाशी असू शकतो, असे बोलले जात आहे.
ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग:15 प्रवासी थोडक्यात बचावले, बस पूर्ण जळून खाक; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे बुलढण्यात जाहीर वाचन:संजय...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
राहुरी मतदानाच्या दिवशीच प्राजक्त तनपुरेंची स्पष्ट भूमिका:भाजप...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
सप्तशृंगी गडावर 22 किलो चांदीचा अपहार!:जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
मध्य रेल्वेचा यू-टर्न, अमित ठाकरेंच्या इशाऱ्याने निर्णय...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
