Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
विद्यार्थी आत्महत्या म्हणजे व्यवस्थेने केलेले खून:सरकार किती खालची पातळी गाठणार? मनसेच्या अमित ठाकरे यांचा नीट पेपरफुटीवर संताप | लाच प्रकरणात ग्रामसेवकाला जामीन मंजूर:सवना येथील घरकुलासाठी घेतली होती अडीच हजारांची लाच | कल्याण रेल्वे स्टेशनवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार:पीडिता मुलगी मामाच्या घरी जात होती; लोकलची वाट पाहताना आरोपीने हेरले | 8500 उमेदवारांनी दिली SRPF ची लेखी परीक्षा:4 परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा, पण बॅगा ठेवण्याची सोय नसल्याने परीक्षार्थींची धावपळ | वाळू तस्कराची महसूलसह पोलिसांना शिवीगाळ:पोलिसी खाक्या दाखवताच उतरली झिंग; माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल
SP News Maregaon
पडळकर आजच्या काळातील मल्हारराव होळकर- खोत:कितीही दिलं तरी ‘माझं काही झालं नाही’ असं म्हणणं सदाभाऊंकडून शिकावं- जयकुमार गोरे

पडळकर आजच्या काळातील मल्हारराव होळकर- खोत:कितीही दिलं तरी ‘माझं काही झालं नाही’ असं म्हणणं सदाभाऊंकडून शिकावं- जयकुमार गोरे

admin 8 hours पूर्वी · 1 min read

auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे

जत तालुक्यामध्ये गेल्या शंभर वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास पडळकरांनी अवघ्या दीड वर्षांत करून दाखवला आहे. त्यांनी केवळ विकासकामेच केली नाहीत, तर येथे नगरपालिका आणि पंचायत समितीही निवडून...

जत तालुक्यामध्ये गेल्या शंभर वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास पडळकरांनी अवघ्या दीड वर्षांत करून दाखवला आहे. त्यांनी केवळ विकासकामेच केली नाहीत, तर येथे नगरपालिका आणि पंचायत समितीही निवडून आणली. मी तर म्हणेन, आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल, तर त्याचे नाव गोपीचंद पडळकर आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, आता मी असे बोललो की काही लोक नक्कीच टीका करायला लागणार, पण आम्हाला चांगलेच माहित आहे की कुठे बटण दाबायचे, असा इशाराही खोत यांनी विरोधकांना दिला आहे. जतची वकिली करण्यासाठी सदाभाऊंना बोलावलं दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी सदाभाऊंना इथे आमदार म्हणून किंवा माझे मित्र म्हणून बोलावलेले नाही. तर जत तालुक्याची वकिली त्यांनी कोणत्याही मानधनाशिवाय करावी, यासाठी त्यांना बोलवले आहे. तुम्ही मंचावर फक्त जतच्या विकासावरच बोलायचं, स्वतःचं वैयक्तिक काहीही बोलायचं नाही. सदाभाऊ सर्वांत चतुर आमदार या जुगलबंदीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही उडी घेतली. गोरे म्हणाले की, सदाभाऊ भाषणात नेहमीच मी खूप साधा माणूस आहे, मला काही समजत नाही असा आव आणतात. पण खरं सांगायचे तर, संपूर्ण महाराष्ट्रात सदाभाऊ खोत यांच्या इतका चतुर आमदार शोधूनही सापडणार नाही. कुणाला कुठे दाबायचं, कुणाकडून कशी कामे करून घ्यायची आणि कितीही मिळाले तरी ‘माझं अजून काहीच झाले नाही, मला कमीच मिळाले’ असे कसे दाखवायचे, याचे ट्रेनिंग जर कुणाला हवे असेल, तर त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याकडूनच क्लास लावायला हवेत.

तुमची प्रतिक्रिया:

संबंधित बातम्या

संबंधित बातम्या

सर्व पहा
error: Content is protected !!