ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

मध्यमवर्गाची आत्ममग्नता चिंताजनक:प्रा. मिलिंद जोशी यांचे मत; अण्णा तळवलकर ट्रस्टतर्फे पुरस्कार वितरण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आंदोलने आणि चळवळी उभ्या करणारा, स्वतःच्या हक्कांसाठी लढणारा मध्यमवर्ग आता स्वतःच्या कोशात जगू लागला आहे. यामुळे संस्थात्मक कार्यासाठी आणि चळवळींसाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा ठप्प झाला असून, मध्यमवर्गाची ही आत्ममग्नता चिंताजनक आहे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. कै. कृ. ब. उर्फ अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित १९ व्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. हा कार्यक्रम प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सोहम ट्रस्टच्या माध्यमातून भिकाऱ्यांच्या जीवनात प्रकाश पेरणारे डॉ. अभिजित सोनावणे यांना ‘समाजशिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच, पॅकेजिंग मशिन्सच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘इंटेरपॅक मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड’ चे संचालक हिमांशू इंगळे यांना ‘अनुकरणीय उद्योजक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी डॉ. अभिजित सोनावणे, डॉ. मनीषा सोनावणे आणि हिमांशू इंगळे उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह आणि ४० हजार रुपये असे आहे. प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले की, जागतिकीकरणानंतर कर्जाच्या रूपाने आर्थिक समृद्धी आली असली तरी, समाजाचा मूल्यविवेक हरवल्यामुळे चंगळवाद वाढला आणि संवेदनशीलता कमी झाली. पूर्वी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते, पण आज ते राहिलेले नाहीत. अन्नामुळे कुपोषित झालेला समाज जसा अपेक्षित नाही, तसाच स्वत्व आणि सत्व हरवल्यामुळे भावनिक दृष्ट्या कुपोषित होत चाललेला असंवेदनशील समाजही अपेक्षित नाही. एकीकडे भौतिक संपन्नतेचा भास निर्माण केला जात असला तरी, दुसरीकडे किळसवाणे वैचारिक दारिद्र्य आहे. समाजातील उच्चभ्रू वर्गाला स्वतःच्या प्रतिष्ठेच्या कल्पना जपण्यात अधिक रस आहे, त्यांच्या दुष्कृत्यांनाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. समाजाचा आर्थिक दृष्ट्या जो खालचा स्तर आहे, त्याची लढाई जगण्याशी आहे, तर मध्यमवर्ग आत्मतुष्ट आहे. समाज म्हणजे माणसांची साखळी असे चित्र अपेक्षित असताना, माणसांची गर्दी असे चित्र दिसते, असेही जोशी यांनी नमूद केले. याची कारणे मानसशास्त्रात सापडणार नाहीत, तर ती समाज व्यवहारात शोधावी लागतील. सामाजिक कार्यासाठी वेळ द्यावा लागतो, पण सध्या वेळेच्या बदल्यात किती पैसे मिळतील याचे गणित मांडले जाते. या मानसिकतेमुळे संस्थात्मक कार्यासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर