ब्रेकिंग न्यूज
News 18 Marathi Headlines | 21 Aug | 9 AM | Kurla-Trombay Railway News | Auto Taxi Fare Price News सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा… मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गोसाई विठुजी कापसे यांचे निधन Jalgaon Crime News | नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा | Police Naik Ganesh Koli कमी खर्चात शेतीतून मिळेल भरघोस उत्पन्न, जमिनीच आरोग्य जपण्यासाठी 3 गोष्टी कराच, Video अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क… Eknath Shinde: कुणबी जात प्रमाणपत्राचा शिंदे गटाला फटका! जातप्रमाणपत्र बोगस आढळल्यानं नगरसेविकेची निवड रद… मारेगावात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लग्नानंतर सगळं सुरुळीत होतं, पण पतीची भयंकर डिमांड, विवाहितेनं…, छ. संभाजीनगर हादरलं!
SP News Maregaon

दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेच्या 10 ते 11 पानांच्या प्रश्नपत्रिका आता 4पानी:एसएससी, एचएससी बोर्ड पानांच्या सेटिंगमध्ये बदल करून फॉन्ट लहान करणार; परीक्षा शुल्कही घटणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत, १० ते ११ पानांच्या प्रश्नपत्रिका आता ४ पानांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणामुळे तसेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्र जोडल्याने मंडळाची दरवर्षी २८ कोटी रुपयांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, बचतीचा थेट फायदा विद्यार्थ्यांना मिळणार असून, आगामी काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात कपात करण्याचा सकारात्मक विचार बोर्डाकडून सुरू आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिका १० ते ११ पानांच्या असल्याने विद्यार्थ्यांना ताण येत होता. त्यामुळे यंदापासून बोर्डाने प्रश्नपत्रिकांची पाने कमी करण्याचा निर्णय घेतला. यात प्रश्न रचनेत बदल नसून, पानांची सेटिंग बदल करून फॉन्ट लहान, मोठे करणार आहे. प्रश्नपत्रिका छपाईवर दरवर्षी ३० कोटी खर्च होतात. सध्या बाजारात रायटिंग व प्रिंटिंग पेपरचा भाव ७५,००० ते ८५,००० रुपये प्रति टन आहे. बदलामुळे २००० टन कागदाची बचत होऊन १५ ते १८ कोटी रुपये वाचणार आहेत. तर प्रिंटिंगसाठीच्या २ कोटी रुपयांचीही बचत होईल. दुसरीकडे, राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी म्हणाले की, पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल, वेळेबाबत नियोजन सोपे जाईल. कठोर कायदा अन‌् पारदर्शकता बोर्डाने परीक्षा पद्धतीत सुधारणेसोबत गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायदा १९८२ मध्ये दुरुस्ती केली जात आहे. आता उत्तरपत्रिकांशी छेडछाड किंवा पुनर्मूल्यांकनातील गैरप्रकार हे दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे ठरवले जातील असे देखील स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर