ब्रेकिंग न्यूज
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video
SP News Maregaon

राऊतांना अभिषेक बॅनर्जींचा पुळका..:..मग बंगालमधील हिंदू अन् कार्यकर्त्यांच्या हत्येवेळी गप्प का होता? नवनाथ बन यांचा सवाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जनाब संजय राऊत यांना अभिषेक बॅनर्जी यांचा पुळका येत आहे. पण याच बंगालमध्ये भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांची, संघाच्या स्वयंसेवकांची आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या झाली त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा संजय राऊत गप्प बसले होते. ममता बॅनर्जी यांचे सरकार होते तेव्हा हिंदूना जगणं मुश्कील झाले होते, हिंदू माता-बहिणींवर जेव्हा अत्याचार झाले त्यावेळी राऊत काहीच बोलले नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचे सरकार असताना अनेक हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना मारले गेले. त्यावेळी राऊत काही बोलले नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना सोडले नाही. आता जनता अभिषेक बॅनर्जीचा बदला घेऊ लागली आहे तर तुम्ही त्यांची बाजू घेत आहात. आम्ही हल्ल्याचे समर्थन करत नाही. पण आम्ही धडा शिकवू असा संदेश पश्चिम बंगालच्या जनतेने दिला आहे हे राऊतांनी लक्षात ठेवले पाहिजे. राऊतांकडून केवळ मस्करीचे काम नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केल्यावर देवाभाऊ आणि अमृता वहिनी हे सर्वसामान्यांप्रमाणे प्रवास करत आहेत. देवाभाऊ ट्रेनने प्रवास करतात. राऊत तुम्ही आवाहनाला प्रतिसाद देणार का? एखाद्या ठिकाणी काही चुकले असेल पण प्रत्येक वेळी थट्टा मस्करी करण्याचे काम राऊतांकडून सुरू असते. त्यांची थट्टा-मस्करी करण्याचे काम जनतेने केले आहे. तनपुरे जनतेतून निवडून येतात, तुमच्यासारखे मागच्या दाराने नाही महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत मविआ आणि उबाठाला राजकीय श्रद्धांजली वाहण्याचे काम केले आहे. तुमच्या पक्षाची कबर खोदण्याचे काम जनतेने विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यावेळी केले आहे. त्यावर लक्ष दिले पाहिजे. प्राजक्त तनपुरे हे जनतेमधून निवडून येणारे नेते आहेत. ते तुमच्या सारखे मागच्या दाराने सभागृहात जात नाहीत. आपल्या पक्षात काय सुरू आहे ते बघा तुम्ही स्वत:च तुमचा पक्षाची कबर खोदली आणि पक्ष त्यामध्ये टाकला असा टोला बन यांनी लगावला आहे. राऊत, पाकिस्तानसाठी स्वतःचा बीपी वाढवून घेऊ नका! नवनाथ बन म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 2 च्या चर्चा सुरू झाल्या आणि संजय राऊत यांचा बीपी वाढतो आहे. कारण ऑपरेशन 2 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवणार म्हटल्याने राऊतांचा चेहरा उतरतो आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवला त्यावेळी हेच संजय राऊत म्हणत होते की दहशतवादी जिंवत आहेत. पाकिस्तानचा उदो-उदो करणे हा पाकिस्तानचा धंदा झाला आहे. तुम्ही सरकारचा नाही तर सैन्याचा अपमान करत आहात. तुम्हाला पाकिस्तानचा बदला घ्यायचा नाही, तुम्हाला पाकिस्तानचा उदो-उदो करायचा आहे. राऊतांनी पाकिस्तानसाठी बीपी वाढवून घेऊ नये.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर