ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

आपल्या स्वतःतील परमेश्वर ओळखला‎ की चित्तवृत्ती शांत होते- रामेश्वर महाराज‎:चारीधाम यात्रा पूर्ण केलेल्या भाविकांच्या स्वागतार्थ गंगापूजन, कीर्तन सोहळा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | कन्नड चराचरातच नव्हे तर प्रत्येकात परमेश्वर आहे तो ओळखण्याची गरज आहे. एकदा का तो ओळखला की सैरभैर झालेल्या चित्तवृत्ती आपोआप शांत होतात, असे प्रतिपादन रामेश्वर महाराज यांनी भिल्ल पलटण येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात केले. भिल्ल पलटण येथे चारीधाम यात्रा पूर्ण करून आलेल्या भाविकांच्या स्वागतार्थ गंगापूजन व भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. चारीधाम यात्रा करून आलेले भाविक गोरखनाथ पुंजाबा पाटील आल्हाड, निर्मलाबाई गोरखनाथ पाटील आल्हाड, केशवराव रामराव राजापुरे, रुक्माई केशवराव राजापुरे, सरस्वतीबाई शामराव राजापुरे, जिजाबाई विश्वनाथ आल्हाड, वच्छलाबाई काशिनाथ आल्हाड यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यांच्या स्वागतार्थ आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात भागवताचार्य रामेश्वर महाराज यांनी आपल्या वाणीतून भक्तिरसपूर्ण कीर्तन सादर केले. त्यांच्या प्रभावी निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात परिसर भक्तिमय झाला होता. या कार्यक्रमाला भाजप नेते, उद्योजक मनोज केशवराव पवार यांनी उपस्थित राहून चारीधाम यात्रा करून आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत केले. यावेळी आपल्या मनोगतात मनोज पवार म्हणाले की, चारीधाम यात्रा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केलीच पाहिजे. विशेषतः तरुणपणी ही यात्रा केल्यास कठीण व अवघड वाटणारी यात्रा अधिक सोपी आणि आनंददायी ठरते. चारधाम यात्रेमुळे आध्यात्मिक समाधान मिळते तसेच जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. कार्यक्रमाला रोहिदास पाटील, पवन ठाकूर, नाना वाळुंजे, किशोर वाघ, साईनाथ आल्हाड, आकाश बोलधने यांच्यासह परिसरातील नागरिक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर