ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

मयत मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना MIDC मध्ये नोकरी:सरकारकडून आदेश जारी, मनोज जरांगे म्हणाले- मी समाधानी नाही

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे भर उन्हात पुकारलेले आमरण उपोषण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आले आहे. सरकारच्या आश्वासनांवर समाधान व्यक्त केल्यावर शासनाने यासंदर्भात नुकताच एक आदेशही जारी केला आहे. मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. मात्र असे असले तरी, जरांगे पाटील यांनी 58 लाख कुणबी नोंदींच्या मुद्द्यावर मोठे भाष्य करत राज्य सरकारला दिलेल्या आपल्या अल्टिमेटमची पुन्हा एकदा स्पष्टपणे आठवण करून दिली आहे. जरांगे म्हणाले, मयत आंदोलकांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र औद्योगिक महामंडळात नोकरी देण्याचा शासनाने निर्णय काढला. त्याचे कौतुक करतो, अभिमानाची गोष्ट आहे. पण मी यात समाधानी नाही, मराठ्यांना आरक्षण दिले असते ते बलिदान गेले नसते, त्यांच्या चुकीमुळे हे बलिदान गेले असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. त्याची सूचना आणि आदेश वरिष्ठ पातळीवर निघणे खूप गरजेचे आहे. त्यांनी आज मंगळवारी काढावेत. महाराष्ट्रातील सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत हा आदेश निघाला पाहिजे की 58 लाख नोंदणी झाल्या आहेत, त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या, नोंदी सापडून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर तुम्हाला बडतर्फ केले जाईल. ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडीटी द्या. या सूचना काढणे खूप गरजेचे आहे. सरकार दोन-तीन दिवसात करतो म्हणते. उलट त्यांनी एक निर्णय काढला म्हणल्यावर एक दिवस आधी काढलाय, त्यांनी गरीबाची मन जिंकावे. हैदराबाद गॅझेट संदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश निघणे गरजेचे आहे. सातारा संस्थांचे गॅझेटर, कोल्हापूर, औंध, पुणे बॉम्बे गोरमेंटचे गॅझेटर याचा सुद्धा जीआर काढणे गरजेचे आहे. सूचना काढल्यानंतर आम्ही समाधानी असणार आहोत त्यांनी ते काम तातडीने हाती घ्यावे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर