Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार:विधान परिषदेला अर्ज मागे घेणारे साहेबराव कांबळे शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रवेश | वैभव सूर्यवंशी म्हणाला- मी जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवेन:रेड बॉल खेळायला आवडतो, कोहलीने खांद्यावर हात ठेवणे स्वप्नासारखे होते | मोदी सरकारने महागाईचे ‘अच्छे दिन’ आणले:नाराज होऊन 2-3 दिवस गावी जाण्याशिवाय शिंदेंकडे पर्याय नाही, भाजप-शिंदे गटात फक्त आडवा अन् जिरवा सुरू- अंबादास दानवे | हृदय हेलावून टाकणारा पत्नीचा संघर्ष:स्ट्रेचर न मिळाल्याने आजारी पतीला पाठीवर वाहण्याची, अकोला जिल्हा रुग्णालयातील प्रकार | मकोका प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण कुर्वे गजाआड:दीड वर्षांनंतर मानकापूर पोलिसांनी सिन्नरमधून केली अटक
SP News Maregaon
मोदी सरकारने महागाईचे ‘अच्छे दिन’ आणले:नाराज होऊन 2-3 दिवस गावी जाण्याशिवाय शिंदेंकडे पर्याय नाही, भाजप-शिंदे गटात फक्त आडवा अन् जिरवा सुरू- अंबादास दानवे

मोदी सरकारने महागाईचे ‘अच्छे दिन’ आणले:नाराज होऊन 2-3 दिवस गावी जाण्याशिवाय शिंदेंकडे पर्याय नाही, भाजप-शिंदे गटात फक्त आडवा अन् जिरवा सुरू- अंबादास दानवे

10 hours पूर्वी · 1 min read

auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे

देशात 'अच्छे दिन'चे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने प्रत्यक्षात मात्र महागाईचेच अच्छे दिन आणले असून, यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर...

देशात ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने प्रत्यक्षात मात्र महागाईचेच अच्छे दिन आणले असून, यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरात वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात आयोजित ‘जनआक्रोश आंदोलना’दरम्यान ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फेरा मारला, महिलांनी गॅस सिलिंडरला हळदीकुंकू वाहून त्याचे पुजन केले.

आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इंधन दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल, महागाई हटाव, मोदी हटाव आणि शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले.

महायुतीला एकनाथ शिंदे नकोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल विचारले असता दानवे म्हणाले, नवी मुंबई हे शहर ठाणे जिल्ह्यातच येते आणि एकनाथ शिंदे हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. असे असतानाही जर त्यांना त्यांच्याच कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यक्रमात बोलावले जात नसेल, तर राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हे स्पष्ट होते. वास्तविक पाहता, महायुतीला आता एकनाथ शिंदे नकोच आहेत.

गावी जाण्याशिवाय शिंदेंकडे पर्याय नाही! अंबादास दानवे पुढे म्हणाले की, भाजप आणि शिंदे गटात सध्या केवळ ‘आडवा आणि जिरवा’ असे राजकारण सुरू असून महायुतीमधील वातावरण पूर्णपणे खराब झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर खोचक टिप्पणी करताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे नाराज होऊन फार फार तर काय करतील? दोन-तीन दिवस गावी जाऊन येतील, याशिवाय त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, अशी बोचरी टीकाही दानवे यांनी यावेळी केली.

तुमची प्रतिक्रिया:
error: Content is protected !!