बेलोरा विमानतळावरून रात्री विमानोड्डाण केव्हा होणार याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी आवश्यक डॉपलर व्हीएचएफ ओम्नीडायरेक्शनल रेंज (डीव्हीओअर) यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याची यशस्वी चाचणी देखील झाली आहे. धावपट्टीवर लाईट्सही बसवण्यात आले असून, विमान हवेत झेपावण्यासह धावपट्टीवर उतरण्यासाठी आवश्यक या दोन्ही महत्त्वपूर्ण दिशादर्शक, मार्गदर्शक यंत्रणा बसवण्याचे काम अगदी अचूक पूर्ण झाले आहे. डीजीसीएचा तांत्रिक विभाग व अभियंत्यांकडून या यंत्रणेची पडताळणीही झाली आहे. तरीही रात्री विमानोड्डाण केव्हा होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. रात्री विमानोड्डाणाचा परवाना डीजीसीएकडून महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला घ्यावा लागतो. यासाठी संपूर्ण कारवाई झाली आहे. काही तांत्रिक कामे शिल्लक असून, कागदपत्रांच्या पुर्ततेतच दिवस निघून चालले आहेत. रात्री विमान धावपट्टीवर उतरवून (लॅण्डींग) नंतर विमानाच्या उड्डाणाची प्राथमिक चाचणी एकदा अचूकपणे झाली की, बेलोरा विमानतळावरून दिवसा व रात्री विमानोड्डाणाची सोय होईल. हीबाब अमरावतीकरांसाठी सुविधाजनक ठरेल.मात्र, डीजीसीएने हिरवी झेंडी दिली नसल्यानेबेलोरा विमानतळावरून नेमके केव्हा रात्रीविमानोड्डाण सुरू होईल, याबाबतअनिश्चितता आहे. आधी मे च्या शेवटपर्यंतरात्री विमानोड्डाण सुरू होईल, असे सांगितलेहोते. परंतु, आता जूनचा पंधरवडाही सुरूझाला आहे. तरी काहीच हालचाली दिसतनसल्याचे चित्र आहे. रात्री विमानोड्डाणाचे शहराला होणारेफायदे शहरात पीएम मित्रा टेक्सटाइल पार्कचेकाम सुरू झाले असून,या निमित्ताने कंपन्यांचेप्रतिनिधी सतत ये-जा करीत असतात.राजकीय नेत्यांनाही अंधार पडण्याच्या आधीकामे, सभा, बैठक आटोपून किंवा अर्धवटसोडून मुंबईकडे निघावे लागते. कारण,मुंबईकडे जायचे असेल तर नागपूरआंतरराष्ट्रीय विमानतळाकडे रवाना व्हावेलागते. अशात जर अमरावतीहूनच रात्रीविमानोड्डाणाची सोय झाली तर ती सर्वांसाठीसुविधाजनक ठरणार असून कोणालाहीनागपुरात जावे लागणार नाही. वेळ, खर्च,दगदग सर्वकाही वाचेल. आरामातअमरावतीहूनच मुंबईकडे रवाना होता येईल.ऐनवेळी कोणाला कामासाठी मुंबईला जायचेअसेल तर त्याचीही सोय होईल.
