महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व परीक्षा रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर झाली. मात्र शहरातील एका परीक्षा केंद्रावर दिव्यांग उमेदवारांना ज्या परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली, त्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रॅम्प, व्हीलचेअर किंवा पर्यायी प्रवेशमार्गाची व्यवस्था नसल्याने अनेक दिव्यांग उमेदवारांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी तब्बल ३८ पायऱ्या चढाव्या लागल्या. या केंद्रावर पायाने दिव्यांग असलेल्या उमेदवारांचा जीव परीक्षा हॉलपर्यंत पोहोचताना अक्षरशः मेटाकुटीला आला होता. काही उमेदवारांना पालकांचा आधार घ्यावा लागला, तर एका उमेदवाराला उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी अक्षरश: उचलून वर्ग खोलीपर्यंत नेल्याची घटना घडली. त्यामुळे दिव्यांग उमेदवारांप्रती प्रशासनाचा असंवेदनशील आणि निष्काळजी दृष्टिकोन उघडपणे समोर आला आहे.परीक्षेसाठी आसन व्यवस्था असलेल्या वर्गखोलीत पोहोचण्यापूर्वीच उमेदवारांसमोर अडथळ्यांची मालिका उभी होती. सर्वप्रथम त्यांना सुमारे दीड फूट रुंदीची नाली ओलांडावी लागत होती.परीक्षेसाठी आसन व्यवस्था असलेल्यावर्गखोलीत पोहोचण्यापूर्वीच उमेदवारांसमोरअडथळ्यांची मालिका उभी होती. सर्वप्रथम त्यांनासुमारे दीड फूट रुंदीची नाली ओलांडावी लागत होती. त्यानंतर १८, ६ आणि १४ अशा तीन टप्प्यांत मिळून ३८पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातपोहोचावे लागत होते. विशेष म्हणजे, याच इमारतीतदुसऱ्या बाजूने प्रवेश केल्यास सुमारे २४ पायऱ्या कमीचढाव्या लागल्या असत्या. मात्र प्रशासनाने अशापर्यायी मार्गाची व्यवस्था न केल्याने दिव्यांगउमेदवारांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.बायोमेट्रीक पद्धती या बाजूने आहे, म्हणून त्या बाजूनेव्यवस्था केली नसल्याची चर्चा या परीक्षा केंद्रावरसुरू होती. शहराच्या विविध भागातील ४७ केंद्रांवरुन (शाळा-महाविद्यालये) ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल १३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व पदवीधरांना ‘एमपीएससी’तर्फे प्रवेशपत्रेही पाठवण्यात आली होती. परंतु ऐन परीक्षेवेळी २ हजार २६३ विद्यार्थी अनुपस्थित असल्याची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या प्रति केंद्र सरासरी ४८ एवढी आहे. आसन व्यवस्था तळमजल्यावर असावी, अशी कोणती तरतूद नाही उमेदवारांची आसन व्यवस्था आयोगाकडून निश्चित केली जाते. दिव्यांगांसाठी तळ मजल्यावर स्वतंत्र आसन व्यवस्था असावी, अशी तरतूद नियमांत नाही. आयोगाकडून प्राप्त रोल नंबरनुसारच आसन व्यवस्था केली जाते. मात्र, तळमजल्यावर रॅम्पची सुविधा आवश्यक आहे. दृष्टीहीन परीक्षार्थींनी सहायक , दिव्यांग परिक्षार्थींना परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ देण्यात येतो, ती सुविधा आयोगाकडून देण्यात येते. – संतोष काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी. अधिवेशनात मुद्दा मांडणार दिव्यांग उमेदवारांना ३८ पायऱ्या चढून परीक्षा द्यावी लागणे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याबाबत प्रशासनाकडून माहिती घेणार असून, येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा सभागृहात निश्चितपणे मांडणार आहे. दिव्यांगांच्या हक्कांशी तडजोड करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. – बच्चू कडू, आमदार, माजी अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय. तळमजल्यावर व्यवस्था करण्याची जुनी मागणीही दुर्लक्षित दिव्यांग उमेदवारांनी यापूर्वीहीपरीक्षा केंद्रांवर तळमजल्यावर आसन व्यवस्थाकरण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडेदुर्लक्ष होत असल्याची खंत दोन परीक्षार्थींनी ‘दिव्यमराठी’शी बोलताना व्यक्त केली. एका दिव्यांगपरीक्षार्थ्याने सांगितले की, ‘आमच्यासाठी इतक्यापायऱ्या चढणे त्रासदायक असते. परीक्षा असल्यामुळेपर्याय नसतो आणि आम्हाला जावेच लागते. अनेकवेळा तळमजल्यावर आसन व्यवस्था करण्याचीमागणी केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पुढील काळात तरी प्रशासनाने दिव्यांग उमेदवारांसाठीस्वतंत्र आणि सुलभ व्यवस्था करावी.
