शहरातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या पार्वती नगर परिसरातील जलकुंभातून घरोघरी पाणी पोहोचवणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे आज, सोमवारचा पाणी पुरवठा खंडित झाला. या जलवाहिनीशी सुमारे ६ हजार कुटुंब म्हणजेच २५ हजार लोकवस्ती जोडली गेली आहे. या नागरिकांना पाणी केव्हा मिळणार, हे अनिश्चित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या मते मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दुरुस्ती कार्य पूर्ण होऊ शकते. परंतु मध्येच आणखी काही बिघाड झाल्यास हा कालावधी अनिश्चित काळासाठी वाढूही शकतो. दरम्यान ऐनवेळी उद्भवलेल्या या बिघाडामुळे परिसरातील पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर, गडगडेश्वर आदी भागातील नागरिकांना आज पाण्याविना दिवस काढावा लागला. काहींनी संचित पाण्याचा वापर करुन दिवस घालवला, तर काहींनी पर्यायी व्यवस्थेच्या आधारे पाण्याची सोय करुन घेतली. दरम्यान मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळपासूनच दुरुस्ती कार्य सुरु केले आहे. जलकुंभातून घरोघरी पाणी पोहोचवणाऱ्या जलवाहिनीला जमीनीच्या आत सुमारे दीड मीटर खोल भागात ‘डक फूट बेन्ड’ असते. या ठिकाणी वरुन खाली येणारा उभा पाइप जमीनीच्या आत असलेल्या आडव्या जलवाहिनीशी जोडलेला असतो. नेमक्या याच ठिकाणी गळती सुरु झाल्याने पाणी पुरवठा खंडित झाला आहे. विशेष असे की जमीनीच्या आतील ‘डक फूट बेन्ड’ दुरुस्तीचे काम हे उर्वरित. पान ४ जुन्या जलवाहिनीमुळेही अडचण अमरावती आणि बडनेरा शहराला अप्पर वर्धा धरणातून (मोर्शी) पाणी पुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वीच डवरगावजवळ ३० वर्षे जुनी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण शहराचा पुरवठा विस्कळीत झाला होता. त्या काळातसंपामुळे दुरुस्तीच्या कामाचा सर्वाधिक फटका पार्वतीनगर, साईनगर , गोपालनगर येथे बसला होता.
