अपना सपना मनी मनी…:महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्रीत कोट्यवधी रुपयांचा ॲडव्हान्स वाटण्यात आल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. अपना सपना मनी… मनी! – राऊतांचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सरकारवर निशाणा साधला. राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी… रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!” देवेंद्र फडणवीसांना केले टॅग संजय राऊत यांनी आपल्या या गंभीर आरोपाच्या ट्विटमध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. एका बाजूला ठाकरे गटाचे 6 खासदार दिल्लीत तळ ठोकून असल्याच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. राऊत यांनी थेट 15 कोटींच्या ॲडव्हान्स’चा आकडा जाहीर केल्याने पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 19 जून रोजी घातल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटात मोठी पडझड घडवून आणण्यासाठी हे ‘ऑपरेशन मनी’ सुरू असल्याचा थेट रोख संजय राऊत यांच्या दाव्यावरून दिसून येत आहे. आता राऊत यांच्या या आरोपावर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान: 31 उमेदवार, 7043 मतदार, ईव्हीएम नव्हे, मतपत्रिकेचा वापर, संभाजीनगरात तिरंगी लढत स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या आमदारांसाठी गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होत आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र, त्यातील अहिल्यानगर, ठाणे, यवतमाळ, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या ६ जागा बिनविरोध झाल्या. सविस्तर वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!