ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

संजय राऊतांच्या शिवीगाळीनेच उबाठावर ही वेळ:रावसाहेब दानवेंची टीका, म्हणाले- तोडफोड करणे ही भाजपची संस्कृती नाही

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उबाठा गटातील सध्याच्या परिस्थितीसाठी भाजप नव्हे, तर पक्षातील अंतर्गत मतभेद आणि संजय राऊतांची आक्रमक भाषा जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही..
माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, उबाठा गटाचे सहा खासदार फुटले, त्यामध्ये भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही. त्यांच्या अंतर्गत वादातून खासदार पक्ष सोडत आहेत आणि त्यासाठी भाजपला जबाबदार धरले जात आहे. हा त्यांचा कमकुवतपणा आहे. राऊतांची भाषा चांगली असती तर… संजय राऊतांवर निशाणा साधताना ते म्हणाले, राऊतांची भाषा अधिक संयमी आणि सुसंस्कृत असती तर आज उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. सततची शिवीगाळ आणि आक्रमक वक्तव्यांमुळेच पक्षातील नाराजी वाढली आहे. तोडफोड करणे ही आमची संस्कृती नाही – दानवे
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. तोडफोड करणे ही भाजपची संस्कृती नाही. भाजपकडून कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ सुरू नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. 6 जागा जिंकल्या, उरलेल्या 11 जागांवरही महायुतीचाच गुलाल
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक होत असून त्यापैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. महायुतीची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील पाठबळ पाहता निकाल महायुतीच्या बाजूने लागेल, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज: ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय – बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी खदखद अनेक दिवसांपासून होती, ती आता बाहेर पडत आहे. पक्षातील लोक का नाराज आहेत, खासदार आणि आमदार वेगळा विचार का करत आहेत, याचा गंभीरपणे विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर