मेधा कुलकर्णींकडे ‘नासकी वृत्ती’ म्हणून पाहिलं जातंय:अभिमन्यू पवार भेद करत नाहीत, वाद मेधा कुलकर्णींच्या हेकेखोर स्वभावामुळेच- रुपाली ठोंबरे

भाजपा खासदार मेधा कुलकर्णी या नेहमी जातीयवाद आणि धर्मभेद करत समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत सहानुभूती घेण्याची सवय झाली असून त्या स्वतः जातीयवादात अडकल्या आहेत. त्यांनी सर्वांना एकत्रित घेऊन विकासाचे राजकारण केले पाहिजे. सध्या त्यांच्याकडे एक ‘नासकी वृत्ती’ म्हणून पाहिले जात आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी मराठा-ब्राह्मण असा वाद करू नये, आणि जर असा प्रयत्न झाला तर त्यांच्यावर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. कालच्या कार्यक्रमातील कथित वादावर बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या की, त्या कार्यक्रमात मराठा किंवा ब्राह्मण असा कोणताही वादाचा मुद्दा उपस्थित नव्हता. मेधा कुलकर्णी या प्राध्यापक असताना नगरसेविका झाल्या आणि आज खासदार आहेत तेव्हापासून त्यांना ओळखते त्यांचा स्वभाव अत्यंत हेकेखोर आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना फक्त मागच्या रांगेत बसायला सांगितले होते, पण केवळ तेवढ्यावरून त्यांनी नाहक त्रागा केला आणि वादाला तोंड दिले. अभिमन्यू पवार हे कोणत्याही जातीमध्ये कधीच भेद करत नाहीत. शहराच्या विकासासाठी काय केले? रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मेधा कुलकर्णी यांनी पुणे शहराच्या विकासासाठी काय केले? पुण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे यावर मेधा कुलकर्णी या पुढे का आल्या नाहीत, असा सवाल ठोंबरे यांनी केला आहे. कोथरूडमध्ये समस्या सोडवताना तुम्ही कधी दिसत नाहीत, लोकांमध्ये जाऊन त्यांचे काम करताना तुम्ही दिसत नाही. केवळ संसदेत जाऊन भाषण करण्याचे काम तुम्ही करतात. मेधा कुलकर्णी या कधीच विकासाचे राजकारण करत नाहीत. त्या जाती-जातीमध्ये आणि धर्मा-धर्मांमध्ये कशी तेढ निर्माण होईल हे त्या बघतात. भाजपने त्याचा अनुभव घेतला हे बरे झाले. त्यांना थांबवणे गरजे आहे हे राजकारणी आणि लोकांचे कर्तव्य आहे. मेधा कुलकर्णी संविधानामुळे खासदार रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, लोकप्रतिनिधींनी काम करत असताना संविधानाप्रमाणे काम केले पाहिजे. काल जो कार्यक्रम होता तो अण्णासाहेब पाटील महामंडळाचा होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आमदार-खासदार उपस्थित होते. मेधा कुलकर्णी या संविधानामुळे खासदार झाल्या आहेत हे त्या विसरतात. पण त्या पहिल्यापासूनच धर्मा-धर्मांमध्ये वाद होतील असे कृत्य करतात. त्या मंदिर, दर्गा यावर बेकायदेशीरपणे आपले म्हणणं मांडत पोलिसांना वेठीस धरण्याचे काम करत असतात. सर्व धर्मांमध्ये ऐक्य राहिले पाहिजे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, आपल्या राज्यात आणि देशात शांतता आणि सर्व धर्मांमध्ये ऐक्य राहिले पाहिजे, असे काम गरजेचे असताना. त्यांना आता जातीचे राजकारण सुरू केले आहे. त्यांना मागे बसायला सांगितल्याने त्यांच्याकडून वाद घालण्यात आला. बरे झाले भाजपच्या लोकांमध्येच हे सर्व काही घडले असेही रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे. अभिमन्यू पवार हे कोणत्याही जातीमध्ये भेद करत नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!