जर पोलिसांचा वापर गुन्हेगारांना वठणीवर आणण्याऐवजी केवळ स्वतःचं राजकारण सरळ करण्यासाठी केला, तर गुन्हेगारांची पोलिसांना शिवीगाळ करण्याची आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्याची हिंमत का होणार नाही?” असा थेट आणि अत्यंत कडक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला विचारला आहे. लातूरमधील पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या गुन्हेगारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत रोहित पवारांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचा आरोप केला आहे. लातूरमधील व्हिडिओचा दाखला रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांशी अत्यंत उद्धटपणे वर्तन करताना, शिवीगाळ करताना आणि हुज्जत घालताना दिसत आहेत. या व्हिडिओचा दाखला देत रोहित पवार म्हणाले की, लातूरमधील या धक्कादायक व्हिडिओमध्ये जे दिसतंय, ते अत्यंत चिंताजनक आहे. राजकारण्यांच्या वरदहस्तामुळेच आज गुन्हेगारांचे धाडस पोलिसांवर हात टाकण्याइतके वाढले आहे. पोलीस प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप थांबवा! राज्य सरकारवर हल्ला चढवताना रोहित पवार पुढे म्हणाले, “सध्याच्या सरकारने आतातरी जागे होण्याची गरज आहे. पोलिसांच्या दैनंदिन कामात आणि तपासात चालणारा राजकीय हस्तक्षेप तात्काळ थांबवला पाहिजे. पोलिसांना त्यांचे काम पूर्ण स्वातंत्र्याने करू दिले, तरच राज्यात कायद्याचे राज्य राहील.” गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही आणि सरकार फक्त स्वतःचे राजकीय हित पाहत असल्याचा आरोप करत त्यांनी गृहविभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे ही वाचा.. उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द:भिवंडीतून प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात; परीक्षा परिषदेचा निर्णय- फेरपरीक्षेसाठी पुन्हा शुल्क लागणार नाहीत
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे देशभरात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा