ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

हटवांजरी येथील धरणासाठी अधिग्रहीत जमिनिचा मोबदला नविन धोरणानुसार मिळावा…

52 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

<<< हटवांजरी येथील शेतकऱ्यांची मागणी>>>

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184

         सविस्तर वृत्त असे की…
हटवांजरी येथील भुसंपादन 7/12/2013 यातील शेत गट क्र.81,83,84,85,86,87,88,89,90,91, 92व 93 याचा फेरफार महाराष्ट्र शासनाच्या नावाने आमची लेखी समती घेतल्या शिवाय घेण्यात येवू नये असी तक्रार तहसील कार्यालय मारेगाव येथे आज सोमवार दिनांक 28/2/2022 ला देण्यात आली आहे.

सिंचन धरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला शासनाच्या  नवीन धोरणानुसार मिळावा म्हणून न्यायालयीन लढाई सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने प्रकल्प ग्रस्ताच्या जमिनीचा फेरफार करण्याची प्रक्रिया सुरू केल्या संदर्भात
  हटवांजरी-सराटी शिवारात सिंचनासाठी धरण बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला.यासाठी या दोन गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमीन खरेदी करून अधिग्रहित केलीआहे

या पैकी सहा शेतकऱ्यांना शासनाच्या नवीन धोरणा नुसार चौपट पटीने नुकसानीचा मोबदला दिला.तर उर्वरित शेतकऱ्यांची जमीन जुन्या धोरणा नुसार अल्प दरात खरेदी केली.त्यामुळे या शेतकऱ्यांचे एकरी सहा ते साडेसहा लाख रुपये नुकसान झाले आहे
त्यामुळे बाबा नानाजी भोयर,विलास विनायक वासाडे, योगराज निळकंठ कालेकर ,वसंता गणपत वासाडे, पुरुषोत्तम रामराव वासाडे,नारायण नामदेव लांडे, विनोद वसंतराव वासाडे , गणेश मारोती जुनगरी, गुलाब गणपत वासाडे, मोहन संभाजी लांडे या शेतकऱ्यांनी भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण नागपूर यांचेकडे वाढीव मोबदल्यासाठी केस दाखल केलीआहे.

        हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असतानाच जिल्हा सिंचन विभागाने आता पुन्हा या शेतकऱ्यांना नोटिसा बजावून अधिग्रहित जमिनीच्या फेरफार करण्या बाबत आक्षेप मांगीतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यात असंतोष असून आम्ही शेत जमिनीचा मोबदला न घेता आमच्या जमिनीचा फेरफार कशा काय होऊ शकतो? असा प्रश्न हे शेतकरी विचारीत असून या अन्याया विरुद्ध या 10 शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय मारेगाव येथे तक्रार दाखल केली आहे. आणि फेरफार परस्पर शासनाचे नावाने घेण्याची कारेवाई तलाठी हटवांजरी यांचे मार्फत होणार आहे अशे शेतकऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर