ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

सोयाबीन पिकांवर चारकोल रॉटचा धोका!

456 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे तातडीची खबरदारी

महत्वाच्या वाढीच्या टप्प्यावर रोगाची तीव्रता वाढण्याची शक्यता – शेतकऱ्यांनी सतर्क राहावे

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला तर्फे वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांमध्ये चारकोल रॉट (मुळकुज व खोडकुज) रोग आढळल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. सध्या  पिकं शेंगा लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत, ज्यामुळे रोगाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

रोगाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे पाने जमिनीकडे झुकणे, पिवळी पडणे आणि मुळाची साल सहज निघणे. रोग प्रगतीशील अवस्थेत झाड पूर्णपणे वाळून मुळावर करड्या भुरकट रंगाची बुरशी दिसते, ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.

रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ उपाय करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे:पिकावर अधूनमधून पडणारा पाऊस रोगाची तीव्रता कमी करण्यात मदत करतो.पिकाला पाणी लागल्यास संरक्षित ओलीत करावी, कारण कोरडी जमीन असल्यास मुळे अन्नद्रव्य शोषू शकत नाहीत.

ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा – २ किलो ट्रायकोडर्मा २५–३० किलो शेणखतात मिसळून पिकाच्या पॅचेसमध्ये फेकावे.थायोफनेट मिथाईल ७०% (Thiophanate methyl 70% WP) या बुरशीनाशकाची दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी, ज्यामुळे रोगाची तीव्रता कमी करता येईल.

रोग नियंत्रण न केल्यास सोयाबीन पिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे योग्य वेळी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर