केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, यांनी केलेल्या न्हावी समाजाबद्दल अपमानास्पद बोलल्याच्या विरोधात न्हावी समाजाच्या वतीने तहसिलदार यांचे कडे निवेदन देत जाहीर निषेध केला..
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की .
मारेगाव तालुक्यातील समस्त न्हावी समाजाच्या वतीने तहसिलदार यांचे कडे काल दिनांक 9 मार्च 2022 रोजी निवेदन दिले असून जालना येथ केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे दिनांक 6 मार्च 2020 रोजी जालना येथे एका कार्यक्रमाला आले होते. आणि त्यांनी त्या व्यासपीठावर न्हावी समाजावर कडवी टीका केली त्या अनुसरुन मारेगाव तालुक्यातील समस्त न्हावी समाज बांधांच्या वतीने तहसिलदार यांचे कडे दिनांक 9 मार्च 2022 रोज बुधवारला निवेदन देण्यात आले आहे.

व ज्या व्यासपीठावर त्यांनी न्हावी समाजावर अपमानास्पद टीका केली त्या व्यासपीठावर त्यांनी न्हावी समाजाची माफी मागावी अशी मागणी निवेदनात केली आहे.अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे या वेळी..
रवी घुमे, आनंद नक्षणे, अजय धांडे, विनोद नक्षणे, प्रमोद जांभूळकर, प्रमोद नक्षणे, अरविंद शेंडे, शंकर सेटे, संजय क्षीरसागर, अमित नक्षने, राजु घुमे, शालिक जांभूळकर, छगन दर्वे, मोरेश्वर बंसोड यांनी ईशारा दिला आहे..
