दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा
या मागणी साठी प्रकल्पात जल सत्याग्रह आंदोलन केले.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगांव तालुक्यातील :- काल दिनांक 6 मे 2022 रोज शुक्रवारला सुमारे 23 वर्षापूर्वी पिडीत शेतकऱ्यांकडून कमी मोबदल्यात शेत जमिनी प्रकल्पाकरिता घेतल्या मात्र मोबदला अतिशय कमी दिल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जल सत्याग्रह आंदोलन केले. त्यामधे शेतकऱ्यांचा प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहे.
1) दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा 2) दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना एकरी 20 लाख सानुग्रह अनुदान देण्यात यावे व शासकिय नौकरी मध्ये कुटूंबातील एक व्यक्तीचा समावेश करावा 3) रोजगार प्रशिक्षण व रोजगार उभारणीसाठी अनुदान देण्यात यावे. 4) जे प्रकल्पग्रस्त भूमिहीन झालेले आहे त्यांना पर्यायी शेतजमीन उपलब्ध करून देण्यात यावी 5) दिंदोडा प्रकल्प बाधित गावांतील परीवरांचा आर्थिक, व सामाजिक अभ्यास करण्यात यावा.
6) वर्धा व वेणा नदीच्या तीरावरील प्रकल्पबाधित गावाचे दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त म्हणुन पुनर्वसन करण्यात यावे 7) प्रकल्पबाधित शेतजमिनीवर ज्यांचे उदरनिर्वाह होता असे शेतमजुर यांना सुध्दा विशेष पॅकेज देण्यात यावे व त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी. 8) वर्धा व वेणा नदी तीरावरील प्रकल्पबाधित गावांतील मच्छीमार बांधवांसाठी विशेष पॅकेज देण्यात यावे व प्रकल्पामध्ये मच्छीमारी करण्याकरीता त्यांना प्राधान्य देण्यात यावे.

9) दिनांक 4/10/2018 ला 71 व्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पाठबंधारे विकास महामंडळाने अधिनियम 1997 मधील तरतुदीनुसार 34 कोटीचे सानुग्रह अनुदान प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे त्या नुसार हेक्टरी 3.10 लक्ष समंधित भूधारकांना वाटप करण्यात यावा.
या प्रमुख मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजुर हे मोठ्या संख्येने उपस्थित होऊन वर्धा नदीच्या पात्रात सांवगी येथील पिडीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचा वाढवी मोबदला व वरील मागण्या पूर्ण कराव्या या उद्देशाने जल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. व प्रशासना कडून लवकरात लवकर या गंभीर विषयाची दखल घेण्यात यावी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला नाय देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी या वेळी केली आहे.
