Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

महापुरुषांच्या विचारानेच समाजाची प्रगती शक्य – व्याख्याते सुधाकर इंगोले

चनोडा येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

संपादक इंजिनीयर सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: “छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी स्वराज्याची निर्मिती केली. अशा या लोककल्याणकारी राजाचे विचार सर्वांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. महिलांनी जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकार्यात पुढे यावे, कारण महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच समाजाची खरी प्रगती शक्य आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते सुधाकर इंगोले यांनी केले.

चनोडा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. १९ फेब्रुवारी रोजी चनोडा येथील ग्रामस्थांच्या वतीने या सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. स्थानिक जिल्हा परिषद शाळेसमोरील प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवश्री दत्ताभाऊ डोये, ज्येष्ठ पत्रकार माणिक कांबळे, देवानंद काकडे, मार्डी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक मोरेश्वर काकडे, रवींद्र पाचभाई, उमाकांत बदकी आणि सुरेंद्र काकडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना दत्ताभाऊ डोये व माणिक कांबळे यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पाचभाई यांनी केले, सूत्रसंचालन निखिल काकडे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल बदकी यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कुणाल वाटेकर, मोहन अहिरकर, अमित काकडे, दादू ढोके, लोकेश काकडे, शुभम दर्वे,

अक्षय ढोके, ज्ञानेश्वर काकडे, समीर सातपुते, तेजस काकडे, सूरज मेश्राम, ओम काकडे, संजय ढोके, आश्रय ढोके आणि प्रशांत अहिरकर यांच्यासह गावातील युवकांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला चनोडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!