Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

महावितरण कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून विद्युत पुरवठा सुरळीत केला.

7 फूट पाण्या मधील 11 केव्ही पोलवरील पिन ईन्सूलेटर बदलवून 15 गावचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील गेल्या दोन दिवसा पासून सतत सुरू असलेल्या पाऊसा मुळे नदी,नाले, ओसांडून वाहत आहे.त्यात तलावा मध्ये वाजवी पेक्षा अधिक प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे. महागाव तलावा मधील असलेला 11केव्ही गावठाण लाईनचा पोल जवळ 7 फूट खोल पाण्याच्या आत मधील पोलवरील पिन ईन्सूलेटर गेल्या मुळे मार्डी 33 केव्ही उपकेंद्र मधुन 11 केव्ही कुंभा गावठाण वाहिनी काल दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोज सोमवारला रात्री 11 वाजे पासून बंद होती.

या वाहिनी वरील सुमारे 15 गावचा वीज पुरवठा बंद होता तो आज दिनांक 9 ऑगस्ट 2022 ला दुपारी दोन वाजता महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून 7 फुट खोल पाण्याखाली असलेल्या पोलवर चडून सुरळीत केला.यावेळी महावितरण कनिष्ठ अभियंता आशिष पवार, प्रधान तंत्रज्ञ प्रफुल रासेकर,जणमिञ उमेश कनाके, सुरज गमे, अंकुश माडेकर ,गिरीश पाचभाई, कातकडे ,वैद्य या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून विद्युत पुरवठा सुरळीत केला त्या मुळे परीसरातील नागरिकांन कडूनी त्यांची स्तुती करण्यात येत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!