चण्याच्या ढग जळून खाक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील सगणापुर येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोज रविवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याचा शेतातील चण्याच्या गंजिला अज्ञात इसमाने आग लावलली. या घटनेत शेतातील जमा करून ठेवलेला चण्याचा ढीग जळून खाक झाला.यात शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.
सविस्तर वृत्त असे की.
वणी येथील शेतकरी विठ्ठल झोलबाजी वैद्य यांची सगणापुर येथे 9 एकर शेती आहे.त्यांनी या वर्षी शेत गट नंबर 11/3 मध्ये 3 एकर चना पिकांची लागवड केली होती व ऊर्वरीत शेतात गहु आणी कपाशी या पिकांची लागवड केली होती.सध्या परीसरात चना पिकाच्या कापणीला सुरूवात झाली आहे.
त्या मुळे विठ्ठलराव यांनी सुद्धा आपल्या शेतातील चना पिकांची कापणी सुरू केली व गावालगच्या शेतात गंजी लावुन ठेवली होती.काल सायंकाळी सालगडी दिवसभर शेतातील काम करुन घरी गेल्यानंतर शेताकडे काही तरी जळत असल्याचे निदर्शनास येताच सालगडी व गावातील काही नागरीकांनी लगेच शेताकडे धाव घेतली शेताकडे गेले असता त्यांना शेतातली चण्याची गंजी जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्या मुळे ही घटना उघडकीस आली.
अज्ञात इसमाने शेतातील हरबऱ्याच्या गंजीला आग लावल्या मुळे शेतकऱ्यांचे सुमारे 8 ते 10 किंटलचे नुकसान झाले आहे.त्यांनी लगेच मारेगांव येथील पोलीस स्टेशन गाठत अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.अज्ञात आरोपी वर कलम 435 भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गर्शनाखाली जमादार भालचंद्र मांडवकर करत आहे.
