उधारीचे पैसे न दिल्याने कृत्य केल्याचा संशय.
गजानन आसुटकर मारेगांव:-तालुक्यातील खैरगाव येथे एका शेतकऱ्याचा शेतातील प्रवासाचे उर्वरित भाडे न दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने चण्याच्या गंजिला आग लावल्याची घटना तालुक्यातील खैरगांव (भेदी) येथे घडली.या आगीत शेतकऱ्याच्या शेतातील चणा जळून खाक झाला असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की…
वाघदरा येथील शेतकरी योगेश नीळकंठ तावाडे यांची खैरगाव (भेदी) येथे 7 एकर शेती आहे.त्यांनी या वर्षी शेतामध्ये 5 एकर मध्ये चण्याची पेरणी केली होती.ऊर्वरीत 2 एकर शेतात गहु या पिकांची लागवड केली होती.सध्या परीसरात चना व गहु पिकाच्या कापणीला सुरूवात झाली आहे.त्या मुळे योगेश यांनी सुद्धा आपल्या शेतातील चना पिकांची कापणी सुरू केली व शेतात गंजी लावुन ठेवली होती.
काल दिनांक 19 मार्च 2023 रोज रविवारला सकाळी काही शेतकरी शेताकडे गेले असता त्यांना योगेश यांचे शेतात काही तरी जळत असल्याचे निदर्शनास आले.त्यांनी लगेच शेतात जाऊन बघीतले असता शेतातील चण्याचा ढीग जळत असल्याचे निदर्शनास आले.या शेतकऱ्यांनी तात्काळ शेतमालकांना या घटने संदर्भात माहिती दिली.त्या मुळे ही घटना उघडकीस आली असुन आगीत शेतकऱ्यांचे सुमारे 20 ते 25 किंटलचे नुकसान झाले आहे.या संदर्भात शेतकऱ्याने लगेच मारेगांव येथील पोलीस ठाणे गाठत एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.
यात त्यांनी वाघदरा येथील संशयित आरोपी संतोष नत्थू भोयर यांनी गाडीचे भाड्याचे पैसे दिले नाही तर मला वसुल करता येते अशी धमकी दिली होती त्यामुळे त्यानेच हा चण्याचा ढीग पेटवला असावा अशा प्रकारची तक्रार दाखल केली.असुन संशयित आरोपी वर कलम 435 भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गर्शनाखाली जमादार चांदेकर करत आहे.
