Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

कंपनीच्या धुळी मुळे गणेशपूरचे शेतकरी त्रस्त.

धुळ बंद करा,अन्यथा करणार आमरण उपोषण!

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन,अडगांव ,गणेशपूर (खडकी ) या परिसरातील खाजगी कंपन्या स्थानिकांच्या जिवावर उठल्या आहेत.कंपण्यातून निघणारा धूर आणि प्रदुषणामुळे शेती व्यवसाय प्रभावीत झाला आहे.मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कोणत्याही प्रकारची कारवाई करतांना दिसत नसल्याने स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्या कडून रोष व्यक्त केला जात आहे.

गणेशपूर जवळील इशान कॅलसी प्रा.लिमिटे कंपणी तून निघणारी धुळ कंपणीच्या भोवतालच्या शेतकऱ्यांच्या पिकावर पडतो आहे.त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आहे.जनारांच्या चाराही धुळीने माखलेला असतो जनावर कशी चारावी हा प्रश्न पडतो आहे.संपूर्ण शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने परिणामी उत्पादन मोठी घट होत आहे.

शेती व्यवसाय व पशुपालन करने कठीण होत चालले आहे.कंपणीतून निघणारी धुळ तात्काळ बंद करण्याची मागणी केली असून अन्यथा दि.६ आगस्ट २०२३पासून आमरण उपोषणाचा इशारा देवराव पिंपळकर,पुरुषोत्तम दुर्गे,महादेव पिंपळकर,सुभाष दुर्गे,सतिश बेलेकर,शुभम आसुटकर,सतोष गौरकार,अनिल गौरकार,विठ्ठल केराम,संदिप मेश्राम,सिताराम मेश्राम,देविदास आसुटकर,दत्ता कुडमेथे,ज्ञानेश्वर कुडमेथे,शंकर डोहे,सुरेश ढेगळे,जगन्नाथ आसुटकर,समिर मडावी,जगण लोडे,गजानन सोमलकर,वसंता गौरकार,अंकीत डोहे या सर्व शेतकऱ्यांनी कंपनीला दिला आहे .

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!