Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अनंतपूर येथे अनेक समस्या ग्रामपंचायत प्रशासनाचे कायम दुर्लक्ष

रस्त्याच्या बाजूला भुमिगत नाली सांडपाणी रस्त्यावर

आरो आहे पण शुद्ध पाणी नाही,आरो बनले शोभेची वस्तू

ज्ञानेश्वर आवारी :- उपसंपादक
विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क झरी (जामणी)

झरी जामणी तालुक्यात अनेक ग्राम पंचायतीनी गावाच्या विकासाच्या नावाखाली लाखो रुपयेचा निधी खर्च केला आहे.जन सुविधेच्या नावाखाली भूमिगत नाली,सिमेंट रोड,सार्वजनिक शौचालय,घनकचराव्यवस्थापन,सोलरलाईट,हायमास्टलाईट,वाटर फिल्टर इ .सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या व .बांधकामे करण्यात आली.परंतु प्रत्यक्षात बांधकाम व सुविधाची दुरावस्था आहे.
मात्र प्रत्यक्ष गावात गेले तर खरे चित्र पहायला मिळते.

झरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर छोटेसे अनंतपूर हे गाव असून हे गाव सुर्लाग्राम पंचायत मध्ये समाविष्ट आहे.शेवटच्या टोकावर असल्याने मुलभूत सुविधा अभाव दिसून येतो.या गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी मागील वर्षी मूमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले.परंतु भूमिगत नाली नावालाच आहे.

बांधकाम करताना खोदकाम करून सिमेंट पाईप टाकणे गरजे असतांना वर -वर ठेवून चेंबर बांधण्यात आले आहे.रोड पेक्षा नालीचे बांधकाम उंच करण्यात आले आहे.हे बांधकाम अतिशय  निकृष्ट दर्जाचे असून एका वर्षात या चंबर व त्यावरी झाकण फूट तूट झाले आहे.चुकीच्या व निकृष्ठ नाली बांधकाम मुळे पाणी नालीतून जाण्या ऐवजी  रस्त्यावरून वाहतांना दिसत आहे.

लोकांना चिखल तुडवत रस्त्याने जावे लागत आहे.बाराही महिने वाहणाऱ्या घाण दुर्गंध सांडपाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.भूमिगत नाली कोणाच्या फायद्याची हे वेगळे सांगायला नको ग्राम वासीयांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी दोन वर्षा आधी आठ लाख निधी खर्च करून आरो आरो वॉटर फिल्टर लावले.काही दिवस बंद चालू अशी अवस्था होती मात्र आता सहा महिने झाले तेही कायमे बंद आहे.

उलट गावाकऱ्यांचा नशीबअशुद्ध व क्षारयुक्त पाणी आहे .उपयोग काही नसल्याने ‘विकणे आहे ‘ संपर्क साधा असे त्यावर लिहून रोष व्यक्त केला आहे. हजारो रुपये  खर्च करून लोकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने रविद्र काकडे,
सुरेश पाचभाई,अभय धोबे,अण्णाजी आस्वले, बाळकृष्ण डोहे यांचे सह अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासना विषयी रोष व्यक्त केला आहे.

चौकट..
जवळ जवळ  हीच तालुक्यातील अनेक गावाची परिस्थिती आहे.केवळ कागदोपत्री विकासाचा बागुलबुवा करून,बोगस व निकृष्ट दर्जाची कामे करून निधी खर्च केला जात असून या भ्रष्ट यंत्रणेतला अधिकारी जबाबदार आहे.अनेक ग्रामपंचायती पैसा हडप केल्याचा तक्रारी आहेत पण अधिकारी न्याय देण्यासाठी असमर्थ असल्याचे चित्र आहे.व्यवस्थेबद्दल जनमाणसात रोष व्यक्त केला जात आहे.


      

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!