सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ न्यायालयाने भाजपचे आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना मोठा कायदेशीर दणका दिला आहे. ‘संविधान बचाव’ आणि ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने या तिन्ही नेत्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. वारंवार न्यायालयाच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हा कठोर निर्णय घेतला आहे. हे प्रकरण २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाशी संबंधित आहे. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने ‘संविधान बचाव’ आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात माजी आमदार राजन तेली, आमदार नीतेश राणे, नीलेश राणे आणि प्रसाद लाड यांच्यासह एकूण ४२ जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. न्यायालयाच्या तारखांना वारंवार गैरहजेरी या प्रकरणाची सुनावणी कुडाळ न्यायालयात सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीला नीलेश राणे, राजन तेली आणि इतर काही आरोपी न्यायालयात हजर होते. मात्र, आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य पाच जण गैरहजर राहिले. नीतेश राणे यांच्या वकिलांनी त्यांच्या गैरहजेरीबाबत न्यायालयात सवलतीचा अर्ज दिला होता. मात्र, न्यायालयाने हा विनंती अर्ज फेटाळून लावला. यापूर्वीही सुनावणीच्या अनेक तारखांना हे नेते गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्यावर, न्यायालयाने कडक पवित्रा घेत थेट अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. आता पुढे काय होणार? अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाल्यामुळे या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता त्यांना न्यायालयात स्वतः हजर होऊन हे वॉरंट रद्द करून घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अन्यथा, तांत्रिकदृष्ट्या पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.
भाजप नेत्यांना कुडाळ कोर्टाचा दणका:नीतेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट; नेमके प्रकरण काय?
-
By सुरेश पाचभाई
- December 24, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
पर्यावरणपूरक होळीचा जागर; शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळात...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
मारेगावात ‘सुक्या फुलांच्या कलाकृती’वर राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांचा चोप:कपडे फोटपर्यंत...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
आखाती देशात युद्धाचा भडका:परदेशात महाराष्ट्राचे हजारो नागरिक...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
अपघात प्रकरणी कुटुंब एकवटलं:कंपनी मालकाचा झोपलेला व्हिडीओ;...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
