लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात. भाजपने खांद्यावर हात टाकले तरी लोक म्हणतात, हा मेला. भाजप म्हणजे विषारी सापासारखी पार्टी आहे. भाजपसोबत न दोस्ती, न दुश्मनी ठेवलेली बरी आम्ही तर दुश्मनी करुण बसलो, ते कधीही नाग पाठवू शकतात, अस म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंगपूर्वी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात पवारांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. टेंडरच्या माध्यमातून खाताय बच्चू कडू म्हणाले की, पूर्वी सिव्हिल सर्जनला असलेले औषध खरेदीचे अधिकार आता मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असून, कमिशनसाठी औषधे महाग केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणारेच आज टेंडरच्या माध्यमातून सर्वाधिक भ्रष्टाचार करत असल्याचे सांगत, त्यांनी एमआरइजीएसचे पैसे आणि दिव्यांगांच्या रखडलेल्या पगारावरून सरकारला धारेवर धरले. ज्या दिव्यांगांना दोन पाय नाहीत, त्यांचे पगार वेळेवर न देणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आता आली आहे, असेही ते आक्रमकपणे म्हणाले. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पैसे काढले बच्चू कडू म्हणाले की, पंधराशे रुपये देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी, दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सरकार जनतेचे पैसे लुटत असल्याचे गणित त्यांनी मांडले. एकीकडून द्यायचे आणि दुसरीकडून काढून घ्यायचे ही सरकारची नीती आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, तर महाराष्ट्रात रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी काळात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत.
भाजप म्हणजे विषारी साप, त्यांच्याशी ना दोस्ती बरी, ना दुश्मनी:न खाऊंगा म्हणणारेच सर्वाधिक खातात, बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल
-
By सुरेश पाचभाई
- February 12, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात बीड जिल्हा नियोजनाला वेग:भावनिक...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 12, 2026
अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाची पहिली...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 12, 2026
महापौरप रितू तावडेंचा पहिला दिलासा, पाणीपट्टी दरवाढ...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 12, 2026
भगतसिंह असते तर चोपला असता:कोश्यारींच्या वक्तव्यावर संदीप...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 12, 2026
परभणीत शिवसेनेचा मुस्लिम महापौर आणि काँग्रेसचा हिंदू...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 12, 2026
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 12, 2026
