गणेश नाईक यांना एकनाथ शिंदेंविरोधातली लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही. त्यांना पाठबळ मिळत नाही. ते म्हणताय की एक दिवस भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एकनाथ शिंदे यांना कारागृहात जावे लागेल असे गणेश नाईक म्हणत आहे. पण त्यांना पाठबळ मिळताना दिसून येत नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, गणेश नाईकांना पाठबळ मिळताना दिसून येत नाही. संजय राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव कॅबिनेट मंत्र्यांवर कोरकडासारखे हल्ले करत आहेत, म्हणून माझे नाईकांना आवाहन आहे की तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवले आहे. तुम्ही स्वगृही आले पाहिजे आणि शिवसेनेतून ही लढाई सुरू केली पाहिजे. आरएसएस ब्रिटिशांविरोधात लढले का? संजय राऊत म्हणाले की, मालेगावच्या उपमहापौरांनी पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावला आहे. यासाठी भाजपसारखी प्रवृत्ती जबाबदार आहे. ते मुस्लीम समाजाला असे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतात. मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी त्या फोटोबद्दल दिलगिरी व्यक्त करत फोटो उतरवला. यात आमच्या पक्षाच्या भूमिकेचा काय संबंध. महाराष्ट्रात ज्यांचे सरकार आहे त्यांनी आदेश काढावा. टिपू सुलतान हा 1799 साली इंग्रजांशी लढताना मरण पावला. काही लोकं त्याला पहिला स्वातंत्रसैनिक आहे असे म्हणतात. भाजप आणि आरएसएसने दाखवावे ते इंग्रजांच्याविरोधात लढले त्यांना कुठे खरचटले, शहीद झाले हे त्यांनी दाखवण्याची गरज आहे. ब्रिटीशांशी लढताना भाजप कुठे होते हे त्यांनी जाहीर करावे. अटल बिहारी वाजपेयी येथे होते हे त्यांनी जाहीर करावे. रामनाथ कोंविद टिपू सुलतानला राष्ट्रपुरुष म्हणाले संजय राऊत म्हणाले की, भाजपला काय काम, धंदा नाही. ते शेतकरी, जनता, नोकरदार, विद्यार्थी प्रश्नावर आंदोलन करत नाहीत. ट्रम्प यांच्याविरोधात कधी त्यांनी प्रश्न विचारले का? केवळ हिंदू-मुस्लीम द्वेषाचे राजकारण करण्याचे काम ते करतात. मालेगावच्या मनपात टिपू सुलतानचा फोटो लागला आणि विरोध होताच उतरला, तो प्रश्न तिथेच संपायला हवा होता, तो वाढवण्याची गरज नव्हती. पण भाजपने आणि त्यांच्या मित्रपक्षाने राज्यभरात आंदोलने केली. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे हे सांगायला काही भाजपची गरज नाही. इतिहासात काही गोष्टींची नोंद आहे. ती भाजपला बदलता येणार नाही. त्यांनी टिपू सुलतानबद्दल आपल्या जुन्या भूमिका काय होत्या हे तपासले पाहिजे. भाजपने नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला. त्यांची भाषणे बघा कर्नाटकमधील. त्यांनी त्यांचा गौरव केला त्यावेळी त्यांना का नाही रोखले. टिपूच्या नावाने अनेक प्रकल्प केले तेव्हा का नाही रोखले. मुंबईच्या महापौर तावडे आणि अमित साटमांनी रोडच्या नावासाठी अनुमोदन दिले आहे. आता निवडणूक नाही उगाच राज्याचे वातावरण खराब करू नका.
सत्तेत राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, गणेश नाईकांनी स्वगृही परतावे:ब्रिटीशांशी लढताना भाजप-आरएसएसला कुठे खरचटले तरी का?- संजय राऊत
-
By सुरेश पाचभाई
- February 16, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
मार्डी–बामर्डा जंगलात फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न फसला;...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
पार्थ काँग्रेसच्या बाबतीत चुकला:रोहित पवारांनीही टोचले पार्थ...
7views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
राज्य मंत्रिमंडळाचे 5 धडाकेबाज निर्णय:महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
साधुग्रामसाठी झाडे तोडणे कोणत्या संस्कृती बसते?:वकील असीम...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
ज्यांचा पक्ष घराणेशाहीवर चालतो, त्यांनी लोकशाहीवर बोलू...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले:विलास लाडच्या...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
