भारतीय निवडणूक आयोग यांनी दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे. रिक्त होणाऱ्या 37 जागांपैकी 12 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी संबंधित सदस्यांच्या आहेत, तर 25 जागा विविध विरोधी पक्षांकडे आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या राजकीय चाचणीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. राज्यनिहाय चित्र पाहिल्यास महाराष्ट्रातून सर्वाधिक सात जागांसाठी निवडणूक होत आहे. त्याखालोखाल तामिळनाडूत सहा, तर पश्चिम बंगाल आणि बिहारमधून प्रत्येकी पाच जागांसाठी मतदान होणार आहे. उर्वरित जागा इतर राज्यांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील सात जागांची निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात असून विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या आधारे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याबाबत उत्सुकता आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. तसेच तामिळनाडूतील कनिमोझी आणि तिरुची शिवा यांचाही कार्यकाळ संपत आहे. याशिवाय राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचाही कार्यकाळ 2 एप्रिलला पूर्ण होत आहे. त्यामुळे या जागांवर नव्या सदस्यांची निवड होणार आहे. 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान पार पडेल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. महाराष्ट्रात विशेषतः सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीबाबत चर्चा रंगली आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले तरी पक्षातील इतर काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम यांची नावे संभाव्य उमेदवारांमध्ये घेतली जात आहेत. याशिवाय ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे अंतिम क्षणी पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात, याकडे लक्ष लागले आहे. शिंदे गटाकडे सुमारे 20 अतिरिक्त मते शिंदे गटाकडे विधानसभेत आवश्यक ते संख्याबळ असल्यामुळे त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो, असे चित्र आहे. यासोबतच त्यांच्याकडे सुमारे 20 अतिरिक्त मते असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारीबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून नेमकी कुणाची वर्णी लागते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 16 मार्च रोजी मतदान, त्याच दिवशी मतमोजणी निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत वेळ देण्यात आली आहे. या सर्व टप्प्यांनंतर 16 मार्च रोजी मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी सुरू होईल. देशातील 37 जागांसाठी होणारी ही निवडणूक पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार असल्याने सर्व पक्षांची हालचाल वाढली आहे. महाराष्ट्रातील सात जागांवरील निकाल राज्याच्या राजकारणात नवे संकेत देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेंचा विश्वासाला पात्र ठरणारा शिलेदार कोण?:एक नाव निश्चित होत असतानाच दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली इच्छा
-
By सुरेश पाचभाई
- March 4, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
संगमेश्वरमध्ये उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक:निधीची...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 4, 2026
संजय राऊतांना युद्धासाठी इराणला पाठवा!:मविआत राज्यसभेवरून मतभेद,...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 4, 2026
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला:शरद पवारांनी दिल्लीत असणे...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 4, 2026
राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर:महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 4, 2026
