Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राज्यात कुठेही गॅस तुटवडा नाही:राऊत कधी गॅसच्या रांगेत दिसले आहेत का?, काँग्रेस काळातील रांगांचे फोटो आज व्हायरल करून लोकांची दिशाभूल- नवनाथ बन

गॅस घरपोच मिळत आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे गॅस घेण्यासाठी कुठे रांगेत उभे आहेत का? कुणीही गॅस घेण्यासाठी रांगेत नाही. उलट 2012 मध्ये गॅससाठी लोकं रांगेत उभे असल्याचे फोटो उबाठा गटाकडून व्हायरल केले जातात, काँग्रेस काळातील परिस्थितीचे फोटो आता टाकण्याची वेळी काँग्रेस आणि उबाठावर आली आहे, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठा-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नवनाथ बन म्हणाले की, देश पुढे जातोय म्हणून तुमची पोटदुखी होत आहे, यातून निर्माण होणाऱ्या गॅसला संजय राजाराम राऊत हे नाव दिले पाहिजे. देशामध्ये सुरक्षात गॅस प्रणाली सुरू आहे. लोकं व्यवस्थित राहताय. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाचा झेंडा अभिमानाने उंचावतो. हे बघून संजय राऊत यांचे पोट दुखत आहे. त्यांनी बाटल्यावर बसून देत गॅस भरावा. त्याला संजय राजाराम राऊत असे नाव द्यावे, तो मातोश्री अन् उबाठाच्या नेत्यांना द्यावा. बाजूच्या देशांची अवस्था पाहा नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी बाजूच्या देशांची काय अवस्था झाली हे पाहणं गरजेचे आहे. तिथे साडेतीनशे रुपये लिटर पेट्रोल-डिझेल झाले आहे. भारत हा मोदींच्या नेतृत्वात सर्वात सुरक्षित देश आहे. देशाचे वाटोळे झाले पाहिजे असे स्वप्न राऊत बघतात. पण ते कधीही पूर्ण होणार नाही. जनतेचा मोदींवर विश्वास आहे. युद्धामुळे राऊत, गांधी, ठाकरे बेरोजगार झाले आहेत. रोज 50 लाख गॅस सिलिंडर वितरित होताय नवनाथ बन म्हणाले की, इराण-इस्रायल युद्धाचा फटका जगभरात बसला असताना भारत सर्वात सुरक्षित देश आहे. आज काही ठिकाणी काही लोकं संजय राऊत सारखे लोकं हे जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम करत आहे. देशभरात आजघडीला 50 लाख गॅस सिलिंडर रोज वितरित केले जात आहे. ज्या होर्मुझ खाडीमधून भारताला कच्च्या तेलाची आयात होते त्या सुरळीत करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. आपण पर्यायी मार्गाचा अवलंब देखील करत आहोत. ज जवळपास इतर देशांकडून आपली कच्च्या तेलाची खरेदी सुद्धा वाढली आहे. राऊत लोकांना पॅनिक करताय नवनाथ बन म्हणाले की, केंद्र सरकार या प्रकरणी खबरदारीचे सर्व उपाय घेते आणि सर्वसामान्य नागरिकांना यांचा फटका बसू नये, गॅस वितरण वेळेत झाले पाहिजे यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. युद्धपातळीवर सगळे पर्याय निवडले जात आहेत. असे असताना संजय राऊत हे जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम करत असून त्यातून ते लोकांना पॅनिक करत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरिकांना वेळेत गॅस कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. देशाचे नागरिक सुद्धा सहकार्य करत आहेत. जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा फटका बसला आहे. पण भारताची भूमी ही सुरक्षित आहे. 2 दिवसांमध्ये गॅस उपलब्ध होतोय नवनाथ बन म्हणाले की, राज्यात कुठेही गॅसचा तुटवटा नाही, प्रत्येक बुकींग केलेल्या नागरिकांना 2 दिवसांमध्ये गॅस उपलब्ध होत आहे. ज्या पद्धतीने राज्य सरकार खबरदारी घेत आहे त्याच पद्धतीने केंद्र सरकार सुद्धा खबरदारी घेते आणि नागरिकांना झळा बसू नये यासाठी काळजी करते. राज्यात 50 लाख सिलिंडरचे रोज वितरण केले जात आहे. संजय राऊत सर्वसामान्याना कुठेही त्रास होत नाही. देशाचे सुरळीत सुरू असल्याने राऊतांना त्रास होत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!