ब्रेकिंग न्यूज
Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार
SP News Maregaon

राऊत पीडित महिलांसोबत की भोंदू बाबासोबत?:बिल्डरांना रेड कार्पेट टाकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, मविआने अडीच वर्ष स्मारकाचं काम ठप्प ठेवले- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भोंदू बाबा खरातनंतर संजूबाबा राऊत हे रोज खोटे बोलण्याचा धंदा सुरू केला आहे. अंजली दमानियांना कुठून माहिती मिळाली याचा तपास सुरू आहे. कुणाला फोन केला म्हणून कोणी लगेच दोषी होत नसतो, राऊत तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? भोंदू खरात की ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या हे पहिले स्पष्ट करा, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, भोंदू बाबा खरातशी कोणी बोलत असेल त्यांचे नाव समोर आले असेल तर तुम्हाला चिंता कशाला? भोंदू बाबा खरातला मदत करण्याचे काम संजय राऊत आणि मविआच्या सरकारने केले आहे. तुमच्याच सांगण्यावरुन खरात यांना मविआ सरकारने मदत करत पाणी दिले.आपले फोन रेकॉर्ड समोर येऊ नये म्हणू देवाभाऊंमुळे गडचिरोलीत विकास नवनाथ बन म्हणाले की, गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवून तिथल्या शेतकऱ्यांना विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ज्या नक्षलवाद्यांनी शेतकऱ्यांना लुटले ते तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला तोच नक्षलवाद हवा होता. आता कोणाकडूनच शेतकऱ्यांना त्रास दिला जात नाही. कोणत्याही खान सम्राटाला पाठिशी घातले जात नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले आहे. नक्षल्याच्या तावडीतून गडचिरोली सोडवण्याचे काम देवाभाऊंनी केले आहे. आता या जिल्ह्याचा विकास सुरू आहे. पण तो उद्योजकांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी हे सरकारचे धोरण आहे. तुमच्यामुळे इंदू मिलच्या स्मारकासाठी वेळ लागला नवनाथ बन म्हणाले की, मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात इंदू मिलची वीट देखील रचली गेली नाही. अडीच वर्षे मविआचे सरकार असताना काम ठप्प ठेवल्याने स्मारकाच्या कामाला उशिर होत आहे. संजय राऊत एक बोट लोकांकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक भव्य झाले पाहिजे ही संकल्पना देवेंद्र फडणवीस यांनी मांडली ती पूर्ण करण्याचे काम सुद्धा भाजपच करेल. डिसेंबर 2026 पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा मानस आहे. तुम्ही पैशासाठी या स्मारकांचे काम थांबवले होते, तुम्ही यावर बोलूच नका. राऊत अफवा पसरवू नका नवनाथ बन म्हणाले की, मुंबईतील खेळाची मैदाने ही खेळाडूंसाठीच असतील. इथे कोणत्याही बिल्डरांची घुसखोरी सहन केली जाणार नाही. बिल्डरांच्या गप्पा तुम्ही मारताय, कोरोना काळात बिल्डरांच्या कशा पद्धतीने उधळपट्टी मविआ सरकारने केले हे जनतेने पाहिले आहे. मैदानावर हॉटेल्स उभे केले जात नाही, माहिती घेऊन बोलत जावे, राऊतांनी अफवा पसरवू नये. मैदानावर खेळाडू आणि विद्यार्थ्यांचा अधिकार आहे हे सरकारचे धोरण आहे. बिल्डरांना हे मैदाने देता येत नाही आपण संपादक होता थोडे तपासून घ्या. उद्धव ठाकरे यांच्या काळात अनेक बिल्डरांना जागा देण्यात आली. तुमचे किती बिल्डरसोबत संबंध आहेत हे जर सांगितले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर