Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

पार्डीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील पार्डी येथे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार (दि. 21 एप्रिल 2026) रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव कैलाश चंद्रभान गाडगे (वय 55, रा. पार्डी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) असे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून ते सुमारे अडीच एकर शेतीवर उदरनिर्वाह करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडगे हे मंगळवारी सकाळी “शेतातील पराठ्या (पिकाचे अवशेष) जमा करण्यासाठी जातो” असे सांगून घराबाहेर पडले होते. बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला असता, ते लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब समोर येताच कुटुंबीयांनी आक्रोश केला आणि गावावर शोककळा पसरली.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, पोलीस संभा लेनगुरे करीत आहेत.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आर्थिक अडचणी, शेतीतील अनिश्चितता किंवा इतर वैयक्तिक कारणांचा तपास पोलीस करीत आहेत. सततच्या संकटांनी ग्रासलेल्या शेतकरी वर्गातील ही आणखी एक दुर्दैवी घटना ठरत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!