Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला:आमदार उत्तमराव जानकर यांचा आरोप; धैर्यशील मोहिते पाटलांनी दिले सावध प्रत्युत्तर | महाराष्ट्राची विक्रमी झेप:सौर कृषिपंपांमध्ये महाराष्ट्राने गाठला देशात सर्वाधिक 10 लाखांचा टप्पा, एकूण सौर पंपांमध्ये 64 टक्के वाटा | महिलांनी अन्यायाविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज:सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांचे प्रतिपादन | निदा खान प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर:टीसीएस धर्मांतर प्रकरणाचा तपासात चौकशीची नोटीस येणार? | मनोज जरांगेंच्या प्रयत्नांना मोठे यश:मराठा आरक्षण आंदोलनातील 34 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत, सरकारची घोषणा
SP News Maregaon
पार्डीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

पार्डीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

2 months पूर्वी · 1 min read

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील पार्डी येथे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार (दि. 21 एप्रिल 2026) रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव कैलाश चंद्रभान गाडगे (वय 55, रा. पार्डी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) असे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून ते सुमारे अडीच एकर शेतीवर उदरनिर्वाह करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडगे हे मंगळवारी सकाळी “शेतातील पराठ्या (पिकाचे अवशेष) जमा करण्यासाठी जातो” असे सांगून घराबाहेर पडले होते. बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला असता, ते लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब समोर येताच कुटुंबीयांनी आक्रोश केला आणि गावावर शोककळा पसरली.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, पोलीस संभा लेनगुरे करीत आहेत.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आर्थिक अडचणी, शेतीतील अनिश्चितता किंवा इतर वैयक्तिक कारणांचा तपास पोलीस करीत आहेत. सततच्या संकटांनी ग्रासलेल्या शेतकरी वर्गातील ही आणखी एक दुर्दैवी घटना ठरत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तुमची प्रतिक्रिया:
error: Content is protected !!