ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

डिझेलसाठी कलेक्टरची परवानगी आणा, पंपचालकांकडून अडवणूक:शेतकऱ्यांनी दिली गोरसेनाला हाक, पदाधिकारी धावले मदतीला‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पुसद तालुक्यात शेतकऱ्यांसमोर डिझेलचे मोठे संकट उभे राहिले आहे. ट्रॅक्टरसाठी व कॅनमध्ये डिझेल मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंपचालक जिल्हाधिकारी परवानगी घेऊन पत्र आणा, तरच डिझेल देऊ असे सांगून परत पाठवत आहेत. त्यामुळे नांगरणी, वखरणीची कामे ठप्प झाली असून, संतप्त शेतकऱ्यांनी गोरसेना पश्चिम यवतमाळचे जिल्हाध्यक्ष जय राठोड यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी सुद्धा सोबत दि.२२ मे रोजी दिलेल्या निवेदन देऊन प्रशासनाला धारेवर धरले आहे. या प्रकरणी जय राठोड, मनीष जाधव यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोन दिवसात लेखी आदेश काढण्याची मागणी केली आहे. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल नाकारणे म्हणजे शेती बुडवण्याचा डाव आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार शेतीसाठी डिझेल नाकारता येत नाही. तरीही पंपचालक मनमानी करत आहेत. हा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे. शेतकरी नेते मनीष जाधव म्हणाले, यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. डिझेल न मिळाल्याने जर पेरणी लांबली तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल. पंप वाले “कलेक्टरची परवानगी’ या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत, असा कोणताही जीआर नाही. हा निव्वळ शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण? वेळेवर नांगरणी-वखरणी झाली नाही तर पेरणी लांबणीवर पडेल. उत्पादन घटेल आणि शेतकरी कर्जाच्या खाईत जाईल. डिझेल न मिळाल्याने जर एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले तर त्याला प्रशासन व हे पंपचालक जबाबदार राहतील, असा संतप्त सवाल दोन्ही संघटनेने उपस्थित केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर