ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

अमरावतीत राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन:राजीव गांधींनी देशात संगणक, दूरसंचार क्रांती घडवली – काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देशमुख

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती येथे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी राजीव गांधी हे देशातील तंत्रज्ञान क्रांतीचे खरे जनक असल्याचे प्रतिपादन केले. देशमुख म्हणाले की, राजीव गांधींनी देशात संगणक, दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगतीची नवी दिशा मिळवली. संगणक आणि दूरसंचार क्षेत्रातील धोरणांमुळे देशातील लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेस भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमात माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्यासह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीव गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. बबलू देशमुख यांनी पुढे सांगितले की, १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक यश मिळाले होते. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी देशाचे सातवे पंतप्रधान म्हणून राजीव गांधींनी जबाबदारी स्वीकारली आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या विचारांमधून काँग्रेस कार्यकर्त्यांना आजही प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले. यावेळी हरिभाऊ मोहोड, जयंतराव देशमुख, संजय वानखडे, प्रकाश काळबांडे, रामेश्वर अभ्यंकर, सतीश हाडोळे, कांचनमाला गावंडे, भागवत खांडे, प्रवीण मनोहर, मुकद्दर खान पठाण, भैय्यासाहेब मेटकर, सुनील जुनघरे, समाधान दहातोंडे, संजय बेलोकर, नंदू यादव, अनिकेत ढेंगळे, रितेश पांडव यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर