ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

जिल्हाधिकाऱ्यांच्या धाडीत लाखोंचा वाळूसाठा जप्त

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बाभुळगाव तालुक्यात सुरू असलेल्या मोठ्या रेतीचोरीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी विकास मिना यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अचानक आढावा दौरा आणि बेंबला धरणाची पाहणी केली. कोणालाही सुगावा लागू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट दुचाकीवरून जात तांभा वाळूघाटावर धडक धाड टाकली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या मोहिमेदरम्यान महसूल विभागाने १५० ते २०० ब्रास वाळू साठा जप्त केला, तसेच रस्त्यावर अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवरही कारवाई केली. बाभुळगाव तालुका गेल्या काही वर्षांत वाळू तस्करीचे मुख्य केंद्र बनला असून, अधिकृत लिलाव झाल्यासारखी तस्कर येथे दिवसाढवळ्या हजारो ट्रक रेती चोरून नेत आहेत. विशेषतः या वर्षी एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तस्कराने तांभा वाळूघाटावर चक्क ट्रक आणि ट्रॅक्टरचा दरबार भरवला होता. तिथे पोकलँड, ट्रेझर बोट आणि मोटारबोट सारख्या अतिआधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने हजारो ट्रक रेतीची चोरी केली जात असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती. यापूर्वी ५ जून रोजी झालेल्या कारवाईसह गेल्या दोन वर्षांत महसूल विभागाने बाभुळगावात अनेकदा रेती जप्त केल्याच्या नोंदी आहेत. मात्र, प्रशासन रेती जप्त करते आणि रात्रीतून तस्कर ती वाहून नेतात, असा येथील जुनाच पॅटर्न राहिला आहे. जप्त केलेल्या रेतीचा पुढे कोणताही ठोस मागोवा घेतला जात नसल्याने ही २०० ब्रास रेती तरी सुरक्षित राहील का, असा खोचक सवाल जनता विचारत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते ही कारवाई केवळ दिखाऊ असून प्रश्नांचा मूळ पाया अद्यापही पोकळ आहे. जप्त रेती रात्रीतून गायब, जुनाच पॅटर्न पुन्हा गेल्या दोन वर्षांत महसूल विभागाने बाभुळगावात अनेकदा रेती जप्त केल्याच्या नोंदी आहेत. परंतु, प्रशासन रेती जप्त करते आणि रात्रीतून तस्कर ती वाहून नेतात,” हा येथील नेहमीचाच प्रकार बनला आहे. जप्त केलेली रेती पुढे कुठे गेली? तिचा लिलाव का झाला नाही? याचा कोणताही ठोस मागोवा प्रशासनाने आजवर घेतलेला नाही. त्यामुळे ५ जून रोजी जप्त केलेली ही २०० ब्रास रेती तरी सुरक्षित राहील का? असा खोचक सवाल जनता विचारत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर