आधी पुनर्वसन, मगच कारवाईची मागणी:व्यापाऱ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन

यवतमाळ शहरातील नेताजी मार्केट परिसरातील फुटपाथ व्यापाऱ्यांवर प्रशासनाने उगारलेल्या अतिक्रमण हटावच्या जाचक कुऱ्हाडीविरोधात गुरुवारी संतापाचा ज्वालामुखी फाटला. “आधी पुनर्वसन करा, मगच कारवाईचा हात लावा!” अशी थेट आणि आक्रमक भूमिका घेत शेकडो अन्यायग्रस्त व्यापाऱ्यांनी आपल्या कुटुंबांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. प्रशासनाच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराचा तीव्र निषेध करत, जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात येथील नेताजी मार्केट परिसरातील फुटपाथ व्यापाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चात व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. ”आधी पुनर्वसन, मगच कारवाई” अशी ठाम भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. प्रशासनाच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराचा तीव्र निषेध करत, जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोचार्चे नेतृत्व विदर्भ अन्याय निवारण समिती अध्यक्ष क्रांती धोटे यांनी केले. यावेळी माजी आमदार विजया धोटे, लालजी राऊत, नगरसेवक संतोष बोरले, डॉ. प्रदीप राऊत, श्रीराम खिरेकर, गणेश कोसरकर, तेजस चव्हाण, संजय लोंढे, प्रकाश बत्रा, गणेश बत्रा, भागचंद कुकरेजा, निलेश पाचकवडे, वाहिद अकबानी, राहुल अग्रवाल, शंकर मोकळकर यांच्यासह नेताजी चौक परिसर व अन्यायग्रस्त शेकडो अतिक्रमणधारक तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment

error: Content is protected !!